जंगल वाढत असल्याने टेन्शन! (सामना - उत्सव पुरवणी)
जंगल वाढत असल्याने टेन्शन ! हो बरोबर वाचले तुम्ही ! जागतिक वारसा स्थळ असलेल्या या अभयारण्यात जंगल वाढत असल्याने मोठीच चिंता निर्माण झाली आहे. हे असे का घडते आहे ? वनविभाग आणि तज्ज्ञ विचारात का पडले आहेत ? भावेश ब्राह्मणकर सर्वसाधारणपणे झाडे तोडली जातात किंवा जंगल नष्ट होते म्हणून चिंता व्यक्त होते. कारण, पर्यावरणाच्या दृष्टीने ती बाब नकारात्मक असते. मात्र, अभयारण्यात जंगल वाढत असल्याने चिंता करण्यासारखी स्थिती आहे, असे कुणी सांगितले तर त्यावर तुमचा विश्वास बसेल ? पण ही वस्तुस्थिती आहे. आसाम मधील मानस राष्ट्रीय उद्यान हे जागतिक वारसा स्थळ आहे. आणि याठिकाणी वृक्षराजी वाढत असल्याने उद्यानाचे रुपांतर जंगलात होत आहे. ही बाब तेथील वन्यजीवांसाठी अडचणीची ठरत आहे. हवामान बदलासह विविध कारणांमुळे गेल्या तीन दशकांत मानस राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पातील गवताळ प्रदेश जवळजवळ ५० टक्क्यांनी कमी झाला आहे. नैसर्गिक प्रक्रिया पाहता गवताळ प्रदेश कमी होऊन जंगल वाढणे यास १०० वर्षांहून अधिक काळ लागतो. मात्र, मानस राष्ट्रीय उद्यानात अवघ्या ३० वर्षात ही प्रक्रिया झाली असल्याने ती...