पोस्ट्स

मे, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारताचा आर्थिक जुगार की धोरणात्मक गरज?

इमेज
आर्थिक बाजू सक्षम करण्यासाठी भारताने परकीय गुंतवणुकीच्या नियमात मोठा बदल केला आहे. यामुळे चिनी गुंतवणूक येऊ शकते. या निर्णयाचे नक्की काय परिणाम होणार ? भावेश ब्राह्मणकर जागतिक राजकारणाच्या पटावर भारत आणि चीन या दोन आशियाई महाशक्तींमधील संबंध नेहमीच एका नाजूक वळणावर राहिले आहेत. २०२० मध्ये लडाख भागातील गलवान खोऱ्यात दोन्ही देशात रक्तरंजित संघर्ष झाला. त्यानंतर भारताने चीनबाबत आर्थिक आघाड्यांवर जे ' आक्रमक ' धोरण अवलंबले होते , त्यात आता एका नव्या वळणाची चाहूल लागत आहे. केंद्र सरकारने १० मार्च २०२६ रोजी ' प्रेस नोट ३ ' मध्ये केलेले बदल हे केवळ तांत्रिक बदल नसून , ते भारताच्या बदलत्या आर्थिक प्राधान्यक्रमाचे निदर्शक आहेत. कार्नेगी इंडियाच्या ताज्या शोधनिबंधात या निर्णयाला भारताचा एक मोठा ' आर्थिक जुगार ' (Economic Gamble) म्हटले आहे. हा लेख या निर्णयाच्या मुळाशी जाऊन त्याचे सखोल विश्लेषण करतो. एप्रिल २०२० मध्ये , जेव्हा जग कोविड-१९ च्या वैश्विक संकटाशी झुंजत होते , तेव्हा भारतीय कंपन्यांचे शेअर बाजारातील मूल्य मोठ्या प्रमाणात घसरले होते. या संधीचा फायदा घेऊन ...

महानगरांची वृक्षपरीक्षा (सामना उत्सव पुरवणी)

इमेज
महाराष्ट्रातील सर्व महानगरांमध्ये सध्या विकासकामांच्या नावाखाली वृक्षांवर सर्रास कुऱ्हाड चालवली जात आहे. विकास विरुद्ध पर्यावरण असे चित्र वास्तविक उभे रहायला नको. वेगाच्या मागे धावताना आपण गुरफटत तर चाललो नाही ना ? भावेश ब्राह्मणकर महाराष्ट्रातील शहरांची आजची अवस्था पाहिल्यास एक जुनी म्हण आठवते , ‘ ज्या झाडाने सावली दिली , त्याच झाडावर कुऱ्हाड चालवणे कृतघ्नपणाचे लक्षण आहे.’ मात्र , आज केवळ कृतघ्नपणा नाही , तर एका महानगरीय आंधळेपणातून आपण आपल्या भविष्याचा गळा घोटत आहोत की काय , अशी भीती वाटू लागली आहे. नाशिक असो की पुणे , मुंबई असो की नागपूर ; आज प्रत्येक शहरात रस्ते रुंद होत आहेत , उड्डाणपूल आभाळाला भिडत आहेत आणि मेट्रो वेगाने धावत आहे. पण या सर्व भौतिक प्रगतीच्या प्रवासात आपण आपल्या शहरातील ' नैसर्गिक फुफ्फुसांना ' म्हणजे हिरव्यागार वृक्षांना मात्र कायमचे गमावत आहोत. सध्या महाराष्ट्रात नाशिकमधील वृक्षतोडीचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात सुरू आहे. कुंभमेळा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे , यात शंका नाही. पण या आयोजनासाठी...