पोस्ट्स

डिसेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाळवंटात चक्क बर्फ! आनंददायी की दुःखदायी? (नवशक्ती)

इमेज
जगभरात सध्या काही फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल झाले आहेत. सौदी अरेबियातील वाळवंटात बर्फ पडल्याचे. बर्फाच्छादित भागात ऊंटांना पाहून सारेच आश्चर्यचकित होत आहेत. मात्र, हे अचानक कसे घडले ? ही घटना आहे की आपत्ती ? भावेश ब्राह्मणकर सौदी अरेबिया म्हटले की सर्वांच्या डोळ्यांसमोर येते ते अंतहीन वाळवंट ,  घाम फोडणारा तप्त उन्हाळा ,  भाजून काढणारे ४५ ते ५० अंश सेल्सियस तापमान आणि असह्य असे कोरडे हवामान. अशा वातावरणात चक्क बर्फवृष्टी झाल्याचे तुम्हाला कुणी सांगितले तर त्यावर तुमचा विश्वास बसेल ?  सोशल मिडियात सध्या काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ते खरे की खोटे ?  कृत्रिम बुद्धिमत्तेने ते बनविलेले नाहीत ना ?  वाळवंटी असलेल्या प्रदेशात हिमवर्षाव होणे ही कल्पनाच मुळात अविश्वसनीय वाटावी अशी आहे. मात्र काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियाच्या उत्तर भागात पडलेल्या बर्फाने ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली. सोशल मीडियावर व्हायरल झालेले बर्फाच्छादित डोंगर ,  पांढऱ्या शुभ्र चादरीत लपलेले वाळवंटी प्रदेश, बर्फातून मार्गक्रमण करणारे ऊंट, वाळवंटातील पिवळसर वाळूवर बर्फाचा थर ...

ऐतिहासिक करारावर ऑस्ट्रेलियाची मोहोर (सामना उत्सव पुरवणी)

इमेज
तुवालू या बेटावरील काही नागरिक ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, हवामान बदलामुळे स्थलांतर करणारे ते पहिले निर्वासित ठरले आहेत. ऐतिहासिक कराराद्वारे ऑस्ट्रेलियाने ही वाट खुली केली आहे. इथून पुढे आणखी किती देश असा करार करतील ? तुवालू नंतर कुठल्या देशाचा नंबर असेल ? भावेश ब्राह्मणकर हवामान बदलामुळे जगभरात अनेक घटना-घडामोडी घडत आहेत. त्यातच ऑस्ट्रेलियामधील एका महत्वपूर्ण घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. ती म्हणजे, अन्य देशातील नागरिकांना चक्क निर्वासित म्हणून स्वीकारण्याची. कल्पना करा की, बांगलादेशातून काही नागरिक भारतात आले तर त्यांना स्वीकारले जाईल का ? त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल का ? तर मुळीच नाही. उलट बांगलादेशी घुसखोरांना शोधण्याची मोहिम भारतभर राबविली जात आहे. मात्र, तिकडे ऑस्ट्रेलियाने चक्क करार करून तेवालू या बेटावरील नागरिकांना स्वीकारण्यास मान्यता दिली आहे. कसं काय ? त्यामागे ऑस्ट्रेलियाचा हेतू किंवा विचार काय आहे ? तुवालू देश तेथील रहिवासी का सोडत आहेत ? दक्षिण पॅसिफिक महासागरातील तुवालू हे इवलेसे बेट. हा देश जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आल...

‘जेन झी’ने आणखी एक सरकार उलथवले (नवशक्ती)

इमेज
जगभरात ‘ जेन झी ’ चळवळ फोफावते आहे. आता युरोपातील एका देशात आक्रमक आंदोलने झाली. पंतप्रधानांनी तडकाफडकी राजीनामा दिला. सरकार कोसळल्याने तेथे पुढे काय होणार ? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भावेश ब्राह्मणकर युरोपातील बल्गेरिया या देशात अभूतपूर्व घटना-घडामोडी घडल्या आहेत. संतप्त तरुणाई रस्त्यावर उतरली. त्यास नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. पाहता पाहता मोठा जनसागर उसळला. अवघ्या ७२ तासांमध्येच सरकारला गुडघे टेकावे लागले. परिणामी, गेल्या पाच वर्षात सहाव्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला. जगभरातच लोकशाही व्यवस्थेवर आघात होत आहेत. बल्गेरियाही त्यातून सुटले नाही. तिथे हे सगळं का आणि कसं घडलं ? आता तिथे पुढे काय होणार ? युरोप म्हणजे स्थैर्य , लोकशाही परंपरा आणि आर्थिक शिस्त , अशी प्रतिमा दीर्घकाळ जोपासली गेली, असे बोलले जाते. मात्र गेल्या दशकभरात ही प्रतिमा हळूहळू बदलत चालली आहे. फ्रान्समधील आंदोलने , इटलीतील अस्थिर सरकार , पूर्व युरोपमधील सत्तासंघर्ष आणि आता बल्गेरियात कोसळलेले सरकार. बल्गेरियातील सध्याची घटना ही एखादी अपघाती राजकीय घटना नक्कीच नाही. तर ती लोकशाही व्यवस्थेतील...

लहानग्यांचा स्क्रीन टाईम कमी करणारा चिनी प्रयोग (नवशक्ती)

इमेज
लहान मुलांचा मोबाईल, टीव्ही, टॅबवरील स्क्रीन टाईम कमी करणे अतिशय आव्हानात्मक झाले आहे. मात्र, जगातील सर्वाधिक तंत्रज्ञानाधिष्ठित असलेल्या चीनने यावर भारी तोडगा काढला आहे. काय आहे तो ? इतर देशही तसे करू शकतील का ? भावेश ब्राह्मणकर लहान मुलांच्या हातातील मोबाईल कसा सोडवायचा हा यक्षप्रश्न केवळ भारतातच नाही तर जगभर आहे. ही समस्या खरं तर दिवसागणिक उग्र होत आहे. जेवणापासून रात्री झोपेपर्यंत लहान मुले मोबाईलच्या आहारी गेलेली पहायला मिळतात. त्याचा परिणाम त्यांच्या आहार, शिक्षण, अभ्यास, शारीरीक क्षमता, झोप आदींवर झाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी नानाविध प्रयोग केले जात आहेत. मात्र, चीनने या क्षेत्रातही आघाडी घेतल्याचे पहायला मिळत आहे.  “ अधिक झोप – कमी स्क्रीन वेळ”   हे राष्ट्रीय धोरणच चीनने जाहीर केले आहे. त्याची जागतिक पातळीवर मोठी चर्चा होत आहे. जगातील सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या चीनने प्राथमिक ते माध्यमिक स्तरावर या धोरणांतर्गत अनेक अमुलाग्र बदल केले आहेत. त्याची दखल सर्वांनीच घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांवरील वाढता अभ्यासाचा बोजा , डिजिटल व्यसन , मानसिक ताण , झोपेच...