पोस्ट्स

जून, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लाखो भारतीय कावळ्यांवर संक्रांत! हा देश करणार विषप्रयोग! (अक्षरनामा)

इमेज
लाखो भारतीय कावळ्यांवर संक्रांत ! हा देश करणार विषप्रयोग ! हेडिंग वाचून दचकलात ना ! पण हे खरे आहे. लाखो भारतीय कावळ्यांचा जीव घेण्यासाठी विषप्रयोगाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे त्याची जगभर चर्चा होत आहे. कोणता आहे हा देश ? एवढ्या मोठ्या संख्येने कावळ्यांना का मारले जाणार आहे ? जाणून घेऊ याविषयी सविस्तर.... भावेश ब्राह्मणकर आपल्याकडे चिमण्या दिसेनाशा झाल्या म्हणून आपण कासावीस झालोय. म्हणूनच आपण चिमणी दिवसही साजरा करायला लागलोय. चिमणी, तिचे आपल्या भोवतीचे अस्तित्व, परिसंस्थेतील तिची जागा या आणि अशा कितीतरी बाबींची जनजागृती केली जात आहे. हे सारे सुरू असतानाच मात्र, भारतीय कावळ्यांवर संक्रांत आल्याची बाब उघड झाली आहे. तुम्हाला असे वाटेल की, कावळ्यांवर का आणि कशी संक्रांत येईल ? पण हे खरे आहे. आणि हे भारतात नाही तर केनियात घडते आहे. केनियामधील हॉटेल व्यावसायिक, शेतकरी यांना चक्क कावळा मारण्याचा परवाना देण्यात आला आहे. कावळ्यांवर विषप्रयोग केला जाणार आहे. त्याद्वारे भारतीय कावळ्यांची संख्या लक्षणीयरित्या घटविण्याचे उद्दीष्ट आहे. केनियातील प्रसारमाध्यमांनुसार, या वर्षभरा...

गरम भट्टी आणि कोरडा घसा! दिल्लीकरांची प्रचंड होरपळ! (दै. नवशक्ती)

इमेज
गरम भट्टी आणि कोरडा घसा ! दिल्लीकरांची प्रचंड होरपळ ! देशाच्या राजधानीत असलेले दिल्लीकर सध्या प्रचंड त्रस्त आहेत. आग ओकणारा सूर्य, प्रचंड उकाडा, पाण्याचे तीव्र दुर्भिक्ष्य, टँकरसाठी वणवण अशा विचित्र आणि कठीण अवस्थेला त्यांना तोंड द्यावे लागत आहे. राजकीय पक्ष, नेते आणि सरकार हे राजकारणात गुंतले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावूनही दिल्लीकर जणू गरम भट्टीत घसा कोरडे करुन बसलेले आहेत. हे असे का झाले ? यास कोण जबाबदार आहे ? भावेश ब्राह्मणकर राजधानी दिल्ली ही रणभूमी आहे. आजवरचा इतिहास तपासला तर असे लक्षात येईल की, येथे लहान-मोठे आणि घनघोर असे असंख्य युद्ध झाले आहेत. त्यामुळेच दिल्लीत नेहमीच अतिशय पराकोटीचे हवामान असते, असे म्हटले जाते. एका तज्ज्ञाच्या मते, या रणभूमीवर प्रचंड संहार झाल्याने मृतात्म्यांमुळे ही भूमी शापित आहे. म्हणूनच ती असंख्य कसोटी पाहत असते. यात तथ्य असो वा नसो पण दिल्लीत उन्हाळा अतिशय तीव्र (म्हणजे किती तर कमाल तपमान तब्बल ५० अंशांपर्यंत पोहचते), पावसाळा धो धो तर हिवाळा कडक (म्हणजे फक्त बर्फ पडायचा बाकी असतो अशा किमान २ ते ३ अंशांपर्यंत) असतो. याचा अर्थ तिन्ह...

भारत-बांगलादेश यांच्यात कोणते करार झाले? मोदी-हसीना यांच्यात काय चर्चा झाली?

इमेज
  भारत-बांगलादेश यांच्यात कोणते करार झाले ?  मोदी-हसीना यांच्यात काय चर्चा झाली ?   बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आल्या. भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या बांगलादेशसोबत भारताचे संबंध अधिक दृढ होण्याच्यादृष्टीने अनेक करार झाले आहेत. आगामी काळासाठी हा दौरा आणि हे करार अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भावेश ब्राह्मणकर गेल्या वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेख हसीना यांची तब्बल १० वेळा भेट दिली आहे. बांगलादेश हा ‘शेजारी राष्ट्र प्रथम’ धोरण , ॲ क्ट   ईस्ट धोरण दृष्टिकोन सागर आणि हिंद - प्रशांत दृष्टिकोनाच्या संगमावर आहे. गेल्या एकाच वर्षाच्या कालावधीत आम्ही एकमेकांच्या सोबतीने , लोक कल्याणाचे अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम पूर्ण केल्याचे मोदींनी म्हटले आहे. अखौडा - अगरतळा दरम्यान भारत बांगलादेशाची सहावी सीमापार रेल्वे लिंक सुरू झाली आहे. खुलना - मोंगला बंदराद्वारे भारताच्या ईशान्येकडील राज्यांसाठी कार्गो सुविधा सुरू करण्यात आली आहे. मोंगला बंदर प्रथमच रेल्वेने जोडले गेले आहे. १३२० मेगा वॅट मैत्री थर्मल पावर प्लांट च्या दोन युनिटनी वीज निर्मि...

पाकिस्तानी पंतप्रधानांच्या चीन दौऱ्याने काय साधले? (दै. लोकसत्ता)

इमेज
  पाकिस्तानी पंतप्रधानांच्या चीन दौऱ्याने काय साधले ? सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाच दिवसांचा चीन दौरा केला आहे. या दौऱ्याने काय साधले ? पाकच्या पदरात काही पडले का ? आगामी काळात काय काय घडू शकेल ? भारतावर काय परिणाम होतील ? भावेश ब्राह्मणकर महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, कर्जबाजारीपणा, आर्थिक हलाखी, डबघाईला आलेली अर्थव्यवस्था अशा कितीतरी संकटांनी पाकिस्तान पिचला आहे. गेल्या मार्च महिन्यात पाकमध्ये नवे सरकार स्थापन झाले. पंतप्रधानपदाची सूत्रे घेतल्यानंतर शाहबाज शरीफ यांनी सर्वप्रथम चीनचा पाच दिवसीय दौरा केला आहे. हा दौरा पाक आणि शरीफ यांच्यासाठी किती महत्त्वाचा होता ? याचे उत्तर म्हणजे शरीफ सरकारने या दौऱ्यासाठी चक्क अर्थसंकल्पच संसदेत जाहीर करण्याचे लांबणीवर टाकले. यातच सर्व सार आले. शरीफ यांनी त्यांच्या काही मंत्र्यांसह १०० उद्योजक आणि व्यावसायिकांसोबत चीन दौरा केला. चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांच्याशी झालेली भेट, त्यांच्यासोबत चर्चा हा त्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा होता. हा दौरा आटोपून शरीफ पाकमध्ये परतले. त्यामुळे या दौऱ्याचे आणि त्याच्य...

दौरा शेख हसीनांचा, कसोटी नरेंद्र मोदींची (दै. नवशक्ती)

इमेज
दौरा शेख हसीनांचा, कसोटी नरेंद्र मोदींची  बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आजपासून भारत दौऱ्यावर येत आहेत. अवघ्या १५ दिवसात दुसऱ्यांदा त्या दिल्लीत येतील. त्यांची ही भेट अनेक अर्थाने महत्त्वाची आहे. कारण, पुढील महिन्यात हसीना या चीन तर मोदी हे बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहेत.   भावेश ब्राह्मणकर नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या शुभारंभावेळी शपथग्रहण सोहळ्यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या दिल्लीत आल्या होत्या. शेजारी देश असलेल्या बांगलादेश सोबत भारताचे खुप चांगले संबंध आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत हसीना यांनी पुन्हा विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे. हसीना या भारत हितैशी आहेत. २१ आणि २२ जून असे दोन दिवसीय त्यांचा हा भारत दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, भारताच्या शेजारी राष्ट्रांवर चीन कुटील डावपेचांचे जाळे फेकत आहे. हसीनांच्या भारत दौऱ्यात अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो तिस्ता नदीच्या पाण्याचा. त्यावर हसीना आणि मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे. तिस्ताच्या पाण्यावरुन भारत आणि बांगलादेशात गेल्या अनेक दशकांपासून तंटा आहे. तो नेमका काय आहे हे ...

वन्यजीव अर्थात वाईल्ड लाईफ क्षेत्रात करिअर करायचं आहे?

इमेज
वाघ, सिंह, हत्ती, गेंडे, पाणघोडा, चितळ, सांभर या आणि अशा असंख्य वन्यजीवांना पिक्चर्स आणि टीव्हीच्या माध्यमातून पाहण्याची संधी मिळत असली तरी त्यांना न्याहाळण्यासाठी प्रत्यक्ष जंगलातच जावे लागते. जैविक विविधतेतील अमूल्य असा घटक असलेल्या या वन्यजीवांविषयी असलेल्या आकर्षण आणि प्रेमातूनच त्यांच्यासाठी काम करतानाच स्वतःचे करिअर घडविण्याचीही मोठी संधी आहे. भावेश ब्राह्मणकर bhavbrahma@gmail.com वनसंपत्ती आणि वन्यजीव ही निसर्गाने दिलेली अनोखी देणगीच आहे. भारतासारख्या देशात तर निसर्गाने वैविध्यपूर्ण अशा वन्यजीवांची उपलब्धी दिली आहे. पश्चिम घाटासारख्या जागतिक वारसा असलेल्या भागात तर विपुल प्रमाणात वृक्ष आणि वन्यजीव आहेत. देशभरात असलेल्या जंगल आणि अभयारण्यांद्वारे ही संपदा तसेच बहुविधता टिकून आहे. जंगलांमधून रबर, लाकूड, औषधी वनस्पती, फळे, फुले आदिंचा लाभ होतो. त्यामुळेच देशाच्या विकासात वनांचा वाटाही अत्यंत मोलाचा ठरतो. अभयारण्ये आणि आरक्षित वनक्षेत्रांच्या माध्यमातून ही नैसर्गिक संपदा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न वनविभागाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकार करीत आहे.  प्रत्यक्षात ३३ टक्के वनांच...

कचरा नव्हे चक्क सोनंच! कचरा व्यवस्थापनात करा करिअर

इमेज
घरगुती, औद्योगिक, वैद्यकीय अशा विविध प्रकारचा कचरा तसं म्हटलं तर डोकेदुखी आहे. पण, या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याचे कसब आजच्या काळाची नितांत गरज आहे. याच क्षेत्रात करिअर करुन कचऱ्याची गंभीर समस्या सोडवून पर्यावरणाच्या रक्षणात हातभार लावू शकतो.  भावेश ब्राह्मणकर bhavbrahma@gmail.com कचरा म्हटलं की आपण त्याकडे तिरस्काराने पाहतो. पण कचराच सोन्याची संधी निर्माण करू शकतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असे चित्र आज निर्माण झाले आहे. घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, वैद्यकीय असा विविध प्रकारचा कचरा आज साचू लागला आहे. पर्यायाने त्याच्या विल्हेवाटीची चिंता निर्माण झाली आहे. जिकडे पहावे तिकडे कचऱ्याचा भस्मासुर दिसून येत आहे. मोबाईल, संगणक वापरून निकामी झाल्यानंतर किंवा ठरावीक काळानंतर ते वापरण्याचा कंटाळा आल्यानंतर ती कचऱ्यातच जातात.  इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचा मोठा प्रश्न सध्या चर्चेत आहेच. पण त्याची विल्हेवाट लावायची कशी? हा कचरा असाच साचू लागला तर त्याने कितीतरी जागा व्यापेल. आज कृषिक्षेत्र कमी करून निवाऱ्याची सोय होत आहे. त्यातच कचराही जागा व्यापू लागल्याने अनेक प्रश्न निर्माण ह...

इको टुरिझम क्षेत्रात करिअर करायचंय?

इमेज
ताडोबातील वाघ, काझिरंगातील गेंडा, गीरमधील सिंह, भरतपूरमधील पक्षी, कोकणातल्या समुद्र किनाऱ्या लगत असलेली प्रेक्षणीय स्थळे, कास पठाराच्या ठिकाणची फुले पाहण्याची ओढ निसर्गप्रेमींसह सर्वांनाच असते. जंगल परिसरासह वन्यजीवांना न्याहाळण्यासाठी केले जाणारे पर्यटन गेल्या काही वर्षात लक्षणीयरित्या वाढले आहे. मात्र, आजही या क्षेत्रात अधिकृत आणि शास्त्रीय माहिती देणाऱ्यांची प्रचंड वानवा आहे. म्हणूनच इको टुरिझमसारखे वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्र अनेकांना खुणावते आहे.  भावेश ब्राह्मणकर bhavbrahma@gmail.com निर्सगाच्या सान्निध्यात जावून आनंदानुभुती मिळवणाऱ्यांची जगभरात कमी नाही. विविध व्याधी, व्याप आणि ताणतणावापासून मुक्ती मिळविण्यासाठी निसर्गात जाण्याचा ट्रेण्ड गेल्या काही वर्षापासून रुढ झाला आहे. पक्षी, प्राणी, वन्यजीव, वृक्षसंपदा पाहण्यासाठी आणि नैसर्गिक बाबींनी नटलेल्या ठिकाणांना भेट देण्यासाठीची मोठी आतूरता दिसून येते. पण, आपल्याला योग्य माहिती मिळेल की नाही याबाबत अनेकांना साशंकता असते. त्यामुळेच इको टुरिझमसारखे क्षेत्र करिअरसाठी उपलब्ध झाले आहे.  देशात आजघडीला सव्वाशेहून अधिक आरक्षित वनक्षेत्...

जैवविविधता (बायोडायव्हर्सिटी) क्षेत्रात करिअरच्या आहेत एवढ्या साऱ्या संधी

इमेज
रंगबिरंगी फुलपाखरं, उडणारा सरडा, रानमांजर, वैशिष्ट्यपूर्ण कीटक, पक्षी आणि दुर्मिळ वनस्पती हे सर्व जैविक विविधतेचे अंग आहेत. निसर्गाचा ठेवा असलेली ही विविधता (बायोडायव्हर्सिटी) भारतात आणि खासकरुन पश्चिम घाटात आपले अस्तित्व जपून आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ही बहुविविधता संकटात सापडली आहे. ही जैवविविधता वाचविण्यासाठी आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी याच क्षेत्रात करिअर करुन आपण परिणामकारक भूमिका बजावू शकतो.  भावेश ब्राह्मणकर bhavbrahma@gmail.com भौगोलिकदृष्ट्या अनोख्या असलेल्या भारताला लाभलेलं एक वेगळी देण म्हणजे पश्चिम घाट. अॅमेझॉनच जंगल जसं जागाला खुणावतं अगदी तसाच पश्चिम घाट संपुर्ण आशिया खंडाला. डोंगर, दऱ्या, समुद्र किनारा, झरे, तळी, धरणं, नद्या, धबधबे, वनसंपदा, प्राणी, वनस्पती असं सारं लोभस वातावरण या घाटाच्या परिसरात आहे. प्राण्यांच्या काही वैशिष्ट्यपूर्ण जाती जगात केवळ या घाटाच्या परिसरातच आढळतात. त्यामुळं जगभरातील असंख्य वन्यजीव आणि निसर्गप्रेमी घाटात भ्रमंती करुन त्यांचं अनोखपण हुडकून काढतात. आणि हीच बाब जेव्हा डिस्कव्हरी, नॅशनल जॉग्राफिक आणि तत्सम टीव्ही चॅनल्सवर पाहत...

जल व्यवस्थापन (वॉटर मॅनेजमेंट) मध्ये करिअर करायचंय?

इमेज
पाऊस समाधानकारक झाला नाही तर धरणांमध्ये पाणी उपलब्ध होत नाही. परिणामी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. तिसरे महायुद्ध पाण्यावरुनच होईल असे म्हटले जाते.  सुकाळ असो की दुष्काळ पाण्याचे मोल अनन्यसाधारणच आहे. वाढते शहरीकरण आणि सर्वच क्षेत्रांमध्ये वाढणारी पाण्याची मागणी लक्षात घेता पाणी व्यवस्थापनालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या क्षेत्रात करिअर करुन आपण अनेकांची तहान भागवू शकतो.  भावेश ब्राह्मणकर bhavbrahma@gmail.com पाणी अर्थातच जीवन. पाण्यामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टी टिकून आहे. मानवाने आजवर अनेक शोध लावले असले तरी कृत्रिमरित्या पाणी निर्माण करण्यात अपयशच आले आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या उपलब्ध पाण्यावरच या जगाचा गाडा चालू आहे. पृथ्वीवर असलेल्या पाण्याच्या उपलब्धतेत गोडया पाण्याचे प्रमाण नगण्य (२.५ टक्के) आहे. यापैकी दोनतृतीयांश साठा हिमनगांमध्ये आहे. उर्वरित एकतृतीयांश साठयापैकी २० टक्के पाणी मनुष्याच्या पोहचण्यापलीकडे, तर ८० टक्के पाण्याचा तीन चतुर्थांश भाग पावसाच्या पाण्याच्या रूपात वाहून जातो. म्हणजे जेमतेम एक टक्काच पाणी आपल्याला वापरायला मिळते. त्यामुळेच पाणी ...

नेपाळचे पोखरा विमानतळ आणि चीनचा कुटील चेहरा (अक्षरनामा)

इमेज
नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी महाकाय कर्ज देऊन शेजारी राष्ट्रांवर अर्थसहाय्याचे जाळे फेकणाऱ्या चीनचा खरा चेहरा उघड झाला आहे. त्याला निमित्त ठरले आहे.... -- भावेश ब्राह्मणकर संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक व मुक्त पत्रकार bhavbrahma@gmail.com -- महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या आणि अतिमहत्वाकांक्षेने ग्रासलेला चीन किती कुटील आहे याचा प्रत्यय वारंवार येतो. आपल्या शेजारी असलेल्या किंवा गरीब, पिचलेल्या राष्ट्रांवर कर्जाचे जाळे फेकणाऱ्या चीनच्या मनिषा काही वेगळ्याच आहेत. अर्थात या छोट्या राष्ट्रांना फक्त मदत दिसते. त्यापलीकडे असलेला चीनचा कावा नाही. त्यामुळे ही राष्ट्रे चीनच्या सापळ्यात सहज अडकतात. त्यातून मग नवे प्रश्न निर्माण होतात. श्रीलंकेतील बंदरे विकसीत करण्याचा प्रकल्प असो की अन्य काही प्रकल्प यातून चीनचा खरा चेहरा जगासमोर आला आहे. सध्या हे सारे लिहिण्याचे कारण म्हणजे, चीनने नेपाळच्या पोखरा या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी केलेले अर्थसहाय्य. एका सजग पत्रकारामुळे चीन कशापद्धतीने गरीब राष्ट्रांची लूट करतोय, हेच उघड झाले आहे. गजे...