पोस्ट्स

जुलै, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भावेश ब्राह्मणकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानची अभ्यासवृत्ती जाहीर

इमेज
  दैनिक लोकसत्ता दैनिक लोकमत लोकसत्ता ऑनलाईन दैनिक पुण्यनगरी  दैनिक दिव्य मराठी  दैनिक महाराष्ट्र टाइम्स दैनिक सकाळ

चीनमुळे लडाखमधील धोका वाढला (अक्षरनामा)

  चीनमुळे लडाखमधील धोका वाढला भारत-चीन सैन्यातील सशस्त्र संघर्षाला ४ वर्षे पूर्ण होत असतानाच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. चीनने पँगॉन्ग त्सो सरोवराच्या ठिकाणी मोठा पूल उभारल्याचे उघड झाले आहे. यामुळे लडाखमधील धोका वाढला आहे. तसेच, आगामी काळात चीनी सैन्यच नाही तर शस्त्रास्त्रे, रणगाडे थेट लडाख सीमेवर येऊ शकणार आहेत. ही बाब भारतासाठी धोकादायक आहे. भावेश ब्राह्मणकर विश्वासघातकी चीनने भारतासोबतचे ताणलेले संबंध आणखी बिघडतील अशा प्रकारचे कृत्य केल्याची बाब समोर आल्याने संरक्षण आणि सामरिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. लडाख प्रदेशातील गलवान खोऱ्यात गेल्या ४ वर्षांपूर्वी भारत आणि चीन सैन्यात हिंसक चकमक झाली. त्यात लष्करी अधिकाऱ्यासह २० जवान शहीद झाले. चीनची किती प्राणहानी झाली हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. या घटनेमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला. पुन्हा भारत-चीन यांच्यात युद्ध होणार का, असा प्रश्नही उपस्थित केला गेला. मात्र, दोन्ही देशांमध्ये बोलणी सुरू झाली आणि हे प्रकरण तेवढ्यावरच थांबले. भलेही भारत-चीन यांच्यातील संबंध सुधारले नसतील पण लष्करी परिस्थिती चिघळली नाही एवढेच. मा...

कारगील युद्धात मरणाच्या दारातून परतले... पाय गमावला... नंतर केला हा विश्वविक्रम...

इमेज
कारगील युद्धात मरणाच्या दारातून परतले... पाय गमावला... नंतर केला हा विश्वविक्रम... कारगील युद्धात तोफगोळा पडला... ते बेशुद्ध झाले... त्यांना मृत घोषित केले... मात्र, ते जिवंत होते... एक पाय गमवावा लागला... सारं काही संपलं नव्हतं... इंडियन ब्लेड रनर ते स्कायडायव्हिंगचा विक्रम करुन त्यांनी इतिहास रचला आहे... त्यांचे नाव आहे मेजर डी पी सिंह... भावेश ब्राह्मणकर कारगीलच्या युद्धात एक पाय गमवावा लागल्यानंतरही तब्बल ९ हजार फूट उंचीवरुन स्कायडायव्हिंग करण्याचा पराक्रम मेजर डी पी सिंह यांनी केला आहे. भारतात अशा प्रकारे युद्धातील जखमी सैनिकाने स्कायडायव्हिंग केल्याची ही पहिलीच घटना नोंदवली गेली. विशेष म्हणजे हा विक्रम नाशिकमध्ये करण्यात आला. या विक्रमानंतर मेजर सिंह यांची मी भेट घेतली. त्यांचे अभिनंदन केले आणि महाराष्ट्र टाइम्ससाठी विशेष मुलाखतही घेतली. मोठ्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावरच मेजर डी पी सिंह यांना हा पराक्रम शक्य झाला. हा पराक्रम देशासाठी शहिद झालेल्या जवानांना आणि त्यांच्या पश्चात अनेक बाबींना तोंड देणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना अर्पण करीत असल्याची भावना सिंग त्यांनी व्यक्...

अमेरिकन निवडणुकीत नाट्यमय घडामोडींची मालिका (नवशक्ति)

इमेज
महानिवडणुकीत नाट्यमय घडामोडींची मालिका अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीने अतिशय नाट्यमय वळण घेतले आहे. ट्रम्प यांच्यावरील जीवघेणा हल्ला, बायडेन यांनी घेतलेली माघार, ट्रम्प यांनी घेतलेली आघाडी आणि कमला हॅरिस यांची निश्चित होणारी दावेदारी या साऱ्याकडेच संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. कारण, महासत्तेचे नेतृत्व कुणाकडे असेल यावर पुढील ५ वर्षेच नाही तर त्यापुढील मोठा काळही अवलंबून असणार आहे.   भावेश ब्राह्मणकर कुठल्याही राष्ट्राची सार्वत्रिक निवडणूक ही तेथील जनता, प्रशासन, राजकीय पक्ष आणि नेते यांच्यासाठी महत्त्वाची असते. किंबहुना ती त्यांच्यासाठीच असते. मात्र, अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशातील निवडणूक ही त्या देशापुरती निश्चितच नाही. कारण, जागतिकीकरण, आधुनिकीकरण आणि उदारीकरणामुळे संपूर्ण जगच छोट्या खेड्यासारखे झाले आहे. तसेच, अमेरिकेसारख्या देशाशी अविकसित, विकसनशील किंवा विकसित अशा कुठल्याही गटातील देश जोडले गेलेले आहेत. मग, ते आर्थिक संबंध असो की लष्करी, सामाजिक किंवा अन्य स्वरुपाचे. म्हणूनच जगभरामध्ये सध्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची जबरदस्त चर्चा आहे. ...

पॅरिस ऑलिम्पिक आणि सीन नदीचा वाद (अक्षरनामा)

इमेज
पॅरिस ऑलिम्पिक आणि सीन नदीचा वाद पॅरिसमध्ये ऑलिम्पिकचा उदघाटन सोहळा तोंडावर असतानाच सीन नदीवरुन बराच वाद सुरू आहे. तो नेमका काय आहे ? या वादामुळे ऑलिम्पिक उदघाटन सोहळ्याला गालबोट तर लागणार नाही ना ? फ्रान्सचे क्रीडामंत्री आणि पॅरिसच्या महापौरांनी या नदीत उड्या का मारल्या ? भावेश ब्राह्मणकर असं म्हणतात की नदीचं मूळ शोधू नये. पण, नाईलाजाने पॅरिसमधील सीन नदीचे मूळ शोधण्याचा प्रयत्न जगभरात सुरू झाला आहे. त्याचे कारण आहे ऑलिम्पिक स्पर्धा. आता तुम्ही म्हणाल की, या स्पर्धांचा नदीशी काय संबंध ? तर तो आहे. ऑलिम्पिकचा उदघाटन सोहळा सीन नदीच्या किनारी तर होणारच आहे शिवाय ऑलिम्पिकच्या काही जलतरण स्पर्धा सुद्धा या नदीच्या पात्रातच होणार आहेत. म्हणूनच ही नदी सध्या जगभरातील मिडिया आणि सोशल मिडियात चर्चेच्या स्थानी आहे. सीन नदीचा हा वाद नेमका काय आहे हे आपण आता जाणून घेऊ.... सीन नदी ही फ्रान्समधील प्रमुख नदी आहे. फ्रान्सच्या उत्तरेला पॅरिस शहर हे या नदीवर वसलेले आहे. या नदीची एकूण लांबी ७७७ किलोमीटर एवढी आहे. पॅरिस शहरात या नदीवर एकूण ३७ पूल आहेत. ही नदी पुढे इंग्लिश खाडीत मिसळते. राजधानी पॅ...

कारगील युध्दाचा धडा (दै नवशक्ती)

इमेज
कारगील युद्धाचा धडा कारगील युद्धाला यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत. देशभक्ती आणि देशाभिमानाला पुन्हा स्फुरण चढेल. पण, या युद्धातून आपण काय धडा घेतला ? भारतीय भूभागावर पुन्हा कब्जा होणार नाही याची पूर्ण खात्री आपल्याला आहे का ? भावेश ब्राह्मणकर विश्वासघात म्हणजे नेमका काय असतो हे भारताला चीन आणि पाकिस्तान यांनी दाखवून दिले आहे. अनपेक्षितपणे भारतीय भूभागावर कब्जा आणि आक्रमण झाले. त्यातील कारगील युद्ध हे अलिकडचे. २६ जुलै १९९९ रोजी भारताने कारगील युद्ध जिंकले. या ऐतिहासिक आणि शूर कार्याचे स्मरण म्हणून कारगील विजय दिन साजरा केला जातो. जम्मू-काश्मीरमधील कारगील हे ठिकाण सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे. सियाचीन आणि काराकोरम पर्वत रांग तसेच पुढे लेह पर्यंतचा विचार करुन पाकिस्तानने कारगीलवर अनधिकृतपणे कब्जा केला. पाकिस्तानी सैन्य हे कारगील या ठिकाणी हिमालय पर्वताच्या वरच्या भागात आणि भारतीय सैन्य दऱ्यांमध्ये अशी स्थिती होती. म्हणजेच, कारगील जिंकणे ही तशी अशक्यप्राय बाब होती. वर असलेल्या शत्रूला खालच्या भागातील हालचाली सहज दिसायच्या. तर खालच्या बाजूला असलेल्या भारतीय सैन्याला शत्रूचा काहीच सुग...

पुन्हा दहशतीत काश्मीर (अक्षरनामा)

इमेज
  पुन्हा दहशतीत काश्मीर भारताचे नंदनवन अशी ओळख असलेले जम्मू-काश्मीर पुन्हा एकदा दहशतीच्या छायेत आले आहे. गेल्या काही दिवसात तेथे दहशतवादी हल्ले सुरू झाले आहेत. हे सर्व अचानक झाले का ? यात कोण दोषी आहे ? भावेश ब्राह्मणकर काश्मीर खोरे पुन्हा एकदा तापले आहे. सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात धुमश्चक्री सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसात दहशतवाद्यांनी तीन मोठे हल्ले केले आहेत. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. गेल्या काही महिन्यांपासून ज्या घडामोडी तेथे घडल्या किंवा घडत आहेत त्यावर बारकाईने नजर टाकली तर हे लक्षात येईल की, सारे काही आलबेल नाही. काश्मीरमध्ये गेल्या महिन्यात अवघ्या ४८ तासात तीन मोठे हल्ले झाले. त्यातील सर्वात मोठा हल्ला होता तो वैष्णव देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बसवर. दहशतवाद्यांनी अचानक आणि तुफान गोळीबार या बसवर केला. या हल्ल्यात ९ भाविकांचा मृत्यू झाला तर ४०हून अधिक जण जखमी झाले. या बसमधील भाविक आणि लहान मुले ओरडत होती आणि दहशतवादी गोळ्यांचा वर्षाव करीत होते. क्रूरपणाचा हा कळसच होता. दहशत निर्माण करण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचे स्पष्ट आहे. डोडा जिल्ह्या...

भारत आणि ब्रिटन व्यापार कराराचे काय? (दै. नवशक्ती)

इमेज
भारत आणि ब्रिटन व्यापार कराराचे काय? ब्रिटनमध्ये सत्तांतर होऊन मजूर पक्ष सत्तेत आला आहे. दीड दशकांनंतर ब्रिटनच्या नेतृत्वात मोठा बदल झाल्याने त्याचे भारतीय संबंधांवर काय आणि कसे परिणाम होणार ? भारताला हुजूर पक्ष अधिक जवळचा की मजूर ? व्यापारासह विविध क्षेत्रावर आणि आयात-निर्यातीवर काही परिणाम होणार का ? भावेश ब्राह्मणकर भारतावर तब्बल दोनशे वर्ष राज्य करणाऱ्या ब्रिटनमध्ये कुठले सरकार आले किंवा गेले तरी त्याचा काय परिणाम भारतावर होतो, असा प्रश्न सर्वसामान्यांना सहाजिकच पडतो. मात्र, जागतिकीकरणामुळे आंतरराष्ट्रीय संबंध, देशोदेशीचे सरकार, राजकारण, रणनिती आणि डावपेच यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. भारतात सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींचे नेतृत्व कार्यरत झाले आहे. तर, ब्रिटनमध्ये गेल्या आठवड्यात निवडणूक निकाल जाहीर झाले. तब्बल १४ वर्षांनी तेथे सत्तांतर झाले. सत्ताधारी हुजूर पक्षाचा पराभव झाला. पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाला जनतेने नाकारले. त्यामुळे ते पायऊतार झाले. आता तेथे मजूर पक्षाचे सरकार आले आहे. केअर स्टॉर्मर यांच्या नेतृत्वात नवे सरकार सत्तारुढ झाले आहे. स्टॉर्मर यां...

चीनमुळेच आसामची दैना (अक्षरनामा)

इमेज
चीनमुळेच आसामची दैना हेडिंग वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटत असेल. पण हे खरे आहे. ईशान्य भारतातील आसाम राज्यात सध्या महापुराने हाहाकार माजला आहे. लाखो नागरिक बाधित झाले असून जवळपास ३ लाख नागरिक निवासी छावण्यांमध्ये दाखल झाले आहेत. चीनच्या बेदरकार आणि कुटिल कारस्थानामुळेच ही दैना उडाली आहे. भावेश ब्राह्मणकर ईशान्य भारतातील अतिशय देखणे राज्य म्हणून आसामची ओळख आहे. त्याशिवाय जगभराला ज्या एकशिंगी गेंड्यांची मोहिनी आहे ते सारे आसाममध्येच नांदत असतात. मात्र ,  याच आसामला गेल्या काही महिन्यांपासून कुणाची तरी नजर लागली आहे.  अतिवृष्टी आणि महापुरामुळे  आसामची पार वाताहत झाली आहे. अस्मानी अशा या आपत्तीमुळे हे राज्य पार कोलमडून जाण्याची चिन्हे आहेत. आसाममध्ये एकूण ३३ जिल्हे आहेत. यातील तब्बल २५ जिल्हे सध्या महापुराच्या तडाख्यात सापडले आहेत. लखीमपुरा जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १ लाख ६५ हजाराहून नागरिक महापुराने बाधित झाले आहेत. बाधित नागरिकांसाठी निवासी छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. आजच्याघडीला आसाममध्ये जवळपास ३ लाख नागरिक निवासी छावण्यांमध्ये वास्तव्याला आहेत. यावरुनच तेथील महा...