पोस्ट्स

एप्रिल, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाक व्याप्त काश्मीर मध्ये भारताचा तिरंगा फडकणार? (पहलगाम हल्ला लेख ४)

इमेज
पहलगाम हल्ला लेख ४ पाक व्याप्त काश्मीर भारतात येणार ? पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर कारवाई करावी आणि पाक व्याप्त काश्मीर (पीओके) पुन्हा भारतात घ्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे. भारत अशा प्रकारची रणनिती आखणार का ? पीओके पुन्हा भारतात येणार का ? सद्यस्थितीत ते शक्य आहे का ?     भावेश ब्राह्मणकर काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट आहे. भारताने आता पाकिस्तानला धडा शिकवावाच आणि पाक व्याप्त काश्मीर पुन्हा भारतात आणावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे. यापूर्वी दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तरादाखल भारताने सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानातील दहशतवाद्यांची स्थळे उद्धवस्त केली आहेत. त्यामुळे भारत सरकारकडून देशवासियांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात हे शक्य आहे का, हे पहायला आहे. पाक व्याप्त काश्मीरचा इतिहास नेमका काय आहे हे आधी समजून घ्यायला हवे. १९४७ मध्ये ब्रिटीशांनी भारत आणि पाकिस्तान यांना स्वतंत्र देशाचा दर्जा देऊन काढता पाय घेतला. त्यावेळी ब्रिटिशांनी तत्कालिन संस्थानांवरील आपला दावा सोडला. या संस्थानांनी भारत किंव...

सिमला करारातून पाक बाहेर; आता काय होणार? भारत काय करणार? (पहलगाम हल्ला लेख ३)

इमेज
पहलगाम हल्ला लेख ३ सिमला करारातून पाक बाहेर ; आता काय होणार ? भारत काय करणार ? सिमला करारातून बाहेर पडण्याची घोषणा पाकिस्तानने केली आहे. भारत-पाक सीमेशी संबंधित हा करार आहे. पाकच्या निर्णयाने आता काय होणार ? भारतापुढे काय पर्याय आहेत ? भावेश ब्राह्मणकर काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला करुन २८ जणांचा बळी घेतल्याने भारत सरकार संतप्त झाले आहे. त्यामुळेच सरकारने पाच मोठे निर्णय घेतले आहेत. त्यात सिंधूजल वाटप करार स्थगित करणे, ज्या पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा दिला आहे, तो रद्द करुन त्यांना पाकमध्ये तत्काळ परत पाठवणे, अटारी वाघा बॉर्डर कायमस्वरुपी बंद करण्याच्या निर्णयांचा समावेश आहे. याला प्रत्युत्तर म्हणून पाक सरकारही आक्रमक झाले. त्यांनी भारतीय विमानांना हवाई हद्द वापरण्यास बंदी घातली आहे तसेच भारत-पाक यांच्यात झालेल्या सिमला करारातून बाहेर पडण्याचे जाहीर केले आहे. हा करार काय आहे ? त्यातून पाकने घेतलेला निर्णय भारतावर काय आणि कसा परिणाम करेल ? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९७१ मध्ये युद्ध झाले. परिणामस्वरुप पाकिस्त...

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

इमेज
पहलगाम हल्ला लेख २ सिंधू करार रद्द केल्याने काय होईल ? पाक काय करेल ? पहलगाम हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत असलेला सिंधू जल वाटप करार (इंडस वॉटर ट्रिटी) स्थगित करण्याचे जाहीर केले आहे. यामुळे पाकिस्तानात एकच हडकंप उडाला आहे. पाकचे कोट्यवधी नागरिक या पाण्यावर जगत आहेत. आता पुढे काय होणार ? अशी विचारणा अनेकांनी केली आहे. त्यानिमित्त यावर टाकलेला हा प्रकाश... भावेश ब्राह्मणकर काश्मीरमध्ये दहशतवादी आजवर लष्करावर हल्ल करत होते. मात्र, आता त्यांनी पहलगाम भागात पर्यटकांवर हल्ला केला. २८ निष्पाप पर्यटकांचा त्यात बळी गेला आहे. ही बाब भारत सरकारच्या जिव्हारी लागली आहे. दहशतवाद्यांना पोसणाऱ्या, त्यांना बळ देणाऱ्या आणि त्यांच्या माध्यमातून भारतावर हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला अद्दल घडविण्यासाठी भारताने सिंधू जल कराराचे हत्यार उपसले आहे. हा करार स्थगित करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. हा करार काय आहे ? तो स्थगित केल्याने काय होईल ? पाकिस्तानची भूमिका काय असेल ? आदींचा घेतलेला हा धांडोळा. भारत आणि पाकिस्तान हे सख्खे शेजारी असले तरी तेवढेच कट्टर शत्रू आहेत. फाळणीनंतर दोन्ही देश...

पहलगाम हल्ल्याचे टायमिंग आणि अनुत्तरीत प्रश्न (नवशक्ती)

इमेज
पहलगाम हल्ल्याचे टायमिंग आणि अनुत्तरीत प्रश्न काश्मीरच्या पहलगाममधील क्रूर दहशतवादी हल्ला हा काही अचानक झालेला नाही. त्यामागे मोठे नियोजन आणि पाक लष्कराची साथ आहे. या हल्ल्याचे टायमिंग पाहता अनेक अनुत्तरीत प्रश्न काय सांगत आहेत ? भावेश ब्राह्मणकर ‘ मिनी स्वित्झर्लंड ’ समजल्या जाणाऱ्या बैसनर या पहलगामच्या भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछुट गोळ्या झाडल्या. निष्पाप २६ जणांचा बळी गेला. हा हल्ला झाला त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियात तर, अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स भारत दौऱ्यावर होते. म्हणजेच, एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचे टायमिंग दहशतवाद्यांनी आणि या हल्ल्याच्या क्रूर सूत्रधारांनी साधले आहे. यापूर्वी काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले. पठाणकोट, उरी व बारामुल्ला (२०१६), अमरनाथ यात्रा (२०१७), पुलवामा (२०१९). मात्र, आताचा हा हल्ला अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी तत्काळ सौदी अरेबियाचा दौरा आटोपून मायदेश गाठले. म्हणजे नियोजित गाठीभेटी आणि अनेक महत्वपूर्ण बाबी अपूर्ण राहिल्या. हे व्हावे हिच कदाचित हल्ल्यामागची योजना असावी. आखात...

हायटेक तंत्रज्ञानाचाही कुंभ (लोकमत)

इमेज
हायटेक तंत्रज्ञानाचाही कुंभ दर बारा वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने हायटेक होऊ शकतो. गर्दी नियंत्रणासह अनेक आव्हाने असले तरी यानिमित्ताने मोठी संधीही आहे. ती आपण कशी एन्कॅश करतो, हेच महत्वाचे आहे.     भावेश ब्राह्मणकर प्रयागराजमध्ये नुकताच महाकुंभ संपन्न झाला तर नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये आणखी दोन वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. या वैश्विक सोहळ्यासाठी कृत्रिम प्रज्ञेसारख्या (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शक्य आहे. कुंभथॉनच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थी आणि स्टार्टअपला नाशिकमध्ये आमंत्रित करण्यात आले. त्यात विविध सादरीकरणही झाले. प्रशासनानेही त्यांच्या गरजा आणि मागणी स्पष्ट केली. अत्यंत कल्पक आणि उत्साही तरुण पिढीच्या सहाय्याने कुंभमेळा सकुशल संपन्न होऊ शकतो. गर्दी व्यवस्थापन हे सिंहस्थातील महाकाय आव्हान आहे. जीपीएसला जोडलेल्या मनगटी पट्ट्या (व्रिस्ट बँड) भाविकांच्या हाताला बांधण्याचा सक्षम पर्याय आहे.   कुठल्या भागात किती गर्दी झाली आहे हे कंट्रोल रुमवरील स्क्रीनवर...

राष्ट्रपतींच्या पोर्तुगाल, स्लोव्हाकिया दौऱ्याचे फलित (नवशक्ती)

इमेज
राष्ट्रपतींच्या पोर्तुगाल, स्लोव्हाकिया दौऱ्याचे फलित सर्वसाधारणपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांची जेवढी चर्चा होते तेवढी अन्य मान्यवरांच्या दौऱ्याची नसते. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी नुकताच केलेला पोर्तुगाल आणि स्लोव्हाकिया या दोन देशांचा दौराही असाच होता. या दौऱ्याने काय साधले ? याचा घेतलेला हा धांडोळा... भावेश ब्राह्मणकर भारतीय राज्यघटनेतील सर्वात मोठे पद असलेल्या राष्ट्रपतींचा दौरा माध्यमांमध्ये झाकोळला जाणे ही तशी नवी बाब नाही. एरवी पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांचे रसभरीत वर्णन होत असते. मोदींभोवतीचे वलय हे त्यामागचे कारण आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची साधी राहणी आणि स्वभाव यामुळे कदाचित त्यांना खचितच प्रसिद्धी लाभते. मूर्म यांनी नुकताच दोन देशांचा दौरा केला. हे दोन्ही देश युरोपातील आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे भारत आणि त्या दोन्ही देशातील संबंध अधिक वृद्धींगत होणार आहेत. तसेच, आगामी काळात व्यापार, संरक्षण अशा विविध क्षेत्रांना चालनाही मिळणार आहे. अमेरिकेने जबर आयात शुल्क जाहीर करुन स्थगिती दिली असली तरी भारताला आपल्या मालाची विक्री करण्यासाठी नवी ...