पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संसदीय कामकाज व्हायला हवे (नवशक्ती)

इमेज
एखाद्या देशाशी थेट युद्ध करण्याऐवजी अप्रत्यक्ष युद्धाची अनेकानेक आयुधे उपलब्ध झाली आहेत. संसदीय कामकाजाला भूसुरुंग लावण्याचे शस्त्र त्यापैकीच एक आहे. गेल्या १०-१५ वर्षातील भारतीय संसदेचा इतिहास काय सांगतो ? भावेश ब्राह्मणकर सीमेवर सैनिक आणि शस्त्रास्त्रांसह युद्ध करण्याचा प्रघात आजच्या आधुनिक युगात मागे पडला आहे. शत्रूला समजणारही नाही अशा पद्धतीने त्याच्यावर भले मोठे अदृष्य आघात करणे, त्याला नामोहरम करणे, सर्वाधिक क्षती पोहचविणे किंवा पार वाताहत करणे अशा प्रकारच्या अत्याधुनिक युद्धशास्त्राचा सर्वत्र बोलबाला आहे. सायबर हल्ला हे त्यातील सर्वाधिक चर्चिले जाणारे शस्त्र आहे. मात्र, त्यापलिकडेही अनेक आयुधे आहेत. ज्याचा वापर अतिशय चपखल पद्धतीने केला जात आहे. खासकरुन गेल्या काही दशकातील भारतीय संसदेच्या कामकाजाचा आढावा घेतला तर ते प्रकर्षाने समोर येईल. भारतीय लोकशाही बळकट होण्यामध्ये संसदीय कामकाज अतिशय महत्वाचे आहे. जनतेने निवडून दिलेले खासदार ‘ देश की बडी पंचायत ’ मध्ये येतात. सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्ही एकाच ठिकाणी जमतात. देशाचा गाडा योग्य पद्धतीने सुरू राहण्यासाठी, चुकत असेल तर स...

तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी? (वसा दिवाळी अंक २०२४)

इमेज
तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी ? इस्त्राईल आणि गाझा यांच्यातील संघर्ष हा केवळ दोन देश किंवा प्रदेशांपुरता नाही. तर त्याला वांशिक आणि जातीय संघर्षाची जबरदस्त किनार आहे. शिवाय हा संघर्ष गेल्या शंभर ाहून अधिक वर्षांपासूनचा आहे. आताच्या युद्धात गाझा धारातीर्थी पडून इस्त्राईल विजयी आविर्भाव दाखवेलही पण, या संघर्षातील ठिणगी तिसऱ्या महायुद्धात रुपांतरीत होण्याची दाट चिन्हे आहेत. इस्त्राईलची सतत धगधगती भूमी आणि इस्त्राईल-अरब युद्धाचा इतिहास तेच सांगतो. भावेश ब्राह्मणकर प्रसंग १ गाझा पट्टीतला समुद्रकिनारा... निरव शांतता.... फक्त समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांचा आवाज... किनाऱ्यावरील दगड आणि बांधकामांआड दडलेले नागरिक... हातात किडूकमिडूक सामान... भेदरलेली नजर... जीव मुठीत घेऊन बसलेले आणि जीवाच्या आकांताने कसली तरी वाट पाहणारे निष्पाप जीव... तेवढ्यात आकाशामध्ये जोराचा आवाज येतो... आवाजाच्या दिशेने सर्वांच्या नजरा खिळतात... लढाऊ विमान क्षणार्धात समोर येतं... मरगळलेल्या जीवांमध्ये शेकडो हत्तींचं बळ संचारतं... सारं बळ एकवटून हे जीव त्या विमानाच्या दिशेनं झेपावतात... विमानातून पॅराशुटच्या आकाराच्या पिश...

दिल्ली कब होगी खुशहाल? (नवशक्ती)

इमेज
राजधानी दिल्ली सध्या गॅस चेंबर झाल्यामुळे कोट्यवधी नागरिकांना श्वास घेणेही मुश्कील झाले आहे. तडफडून केली जाणारी ही हत्याच नाही का ? हे असे का झाले ? त्यास कोण आणि कसे कारणीभूत आहे ? यातून सुटका होऊ शकते की नाही ? जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि लोकसंख्या असलेल्या देशाच्या राजधानीची अवस्था अक्षरशः गॅस चेंबर अशी झाली आहे. विशेष म्हणजे हे पहिल्यांदाच झालेले नाही. तर ते दरवर्षी होते. याच हिवाळ्यामध्ये दिल्लीतील हवेची गुणवत्ता प्रचंड ढासळते. सध्या तर अशी स्थिती आहे की, दिल्लीकर जो श्वास घेत आहे ती हवा ४० ते ५० सिगारेट ओढल्याने तयार होणाऱ्या धुरासारखी आहे. म्हणजेच, ही हवा थेट फुफ्फुसावर घाला घालते. खास म्हणजे, या अशुद्ध हवेतून राजकारणी, प्रशासकीय अधिकारी असे कुणीच सुटलेले नाही. सगळ्यांना याच हवेचे श्वसन करावे लागते आहे. असे असले तरी हा प्रश्न सुटत का नाही ? दरवर्षी एवढी बोंबाबोंब होते तरी काहीच कसे घडत नाही ? शाळा बंद करणे, सार्वजनिक सुटी जाहीर करणे, वाहनांसाठी सम-विषम पद्धत लागू करणे या आणि अशा थातूरमातूर प्रयोगांनी आतापर्यंत दिल्ली गाजवली आहे. तत्कालिक मलमपट्टी लावण्याकडे असलेली मान...

पर्यावरण संकटाची छाया (नवशक्ती)

इमेज
अझरबैजानची राजधानी बाकू येथे सध्या जागतिक पर्यावरण परिषद (कॉप २९) भरली आहे. हवामान बदल या वैश्विक समस्येवर तोडगा काढण्यासाठीच्या विचारमंथनासाठी देशोदेशीचे तज्ज्ञ, सरकारी प्रतिनिधी तेथे डेरा टाकून आहेत. गेल्या वर्षी दुबई, यंदा बाकू ! खरंच काही साध्य होते आहे का ? की शब्दांचेच बुडबुडे आणि पांढरा कागद काळा होतो आहे ? भावेश ब्राह्मणकर वाळवंटात हिमवर्षाव... सौदी अरेबियाच्या अल-जॉफ प्रदेशात इतिहासामध्ये प्रथमच मुसळधार हिमवर्षाव आणि पाऊस... स्पेनमध्ये अतिवृष्टी आणि महापुराने हाहाकार... आणखी एक सर्वाधिक उष्ण वर्ष जाहीर... या आणि अशा कितीतरी बातम्या, घटनांनी जगभर चिंतेचे काहूर माजले आहे. शिवाय भीतीच्या ढगांनीही गर्दी केली आहे. अशाच वातावरणात दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरण परिषदेचा सोपस्कार पार पडतो आहे. ठिकाण फक्त वेगळे आहे. जागतिक तपमान वाढ, हवामान बदलासारख्या समस्या थोपविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर या परिषदांमध्ये ठोस निर्णय अपेक्षित आहेत. मात्र, ते होत आहेत का ? आजवरच्या पर्यावरण परिषदांचा इतिहास काय सांगतो ? हे वैश्विक संकट काहीसे निवळते आहे का ? हे सारेच जाणून घेणे आवश्यक आहे...

ट्रम्प पर्वाचे प्रश्र्नोपनिषद! (नवशक्ती)

इमेज
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला आहे. अतिशय स्फोटक अशी प्रतिमा असलेले ट्रम्प पुन्हा सत्तेत का आले ? सत्ताधारी कमला हॅरीस यांचा पराभव का झाला ? ट्रम्प यांची ध्येयधोरणे काय असतील ? आगामी काळात भारतासह जगभर काय परिणाम होतील ? भावेश ब्राह्मणकर जगातील बलाढ्य राष्ट्र असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा विराजमान होणार आहेत. अमेरिकनांनी दिलेला कौल स्पष्ट झाला आहे. सत्ताधारी डेमोक्रेटिक पक्षाला जनतेने नाकारले आहे. त्यामुळेच साडेचार वर्षांच्या कालावधीनंतर ट्रम्प पुन्हा सत्तेत आले आहेत. मात्र, पहिल्यांदा सत्तेत आलेले ट्रम्प आणि आताचे यात कमालीचा फरक आहे. त्याचे संदर्भही वेगळे आहेत आणि परिणामही. महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्ष निवडीचा जगभरातील विविध क्षेत्रावर परिणाम होतो. आताही तो होणारच आहे. तत्पूर्वी ट्रम्प का आले, हॅरिस का पराभूत झाले हे पाहणेही महत्वाचे आहे. ट्रम्प यांना २९४ (५०.८ टक्के) तर हॅरिस यांना २२३ (४७.५ टक्के) इलेक्टोरल मते मिळाली आहेत. विजयासाठी २७० मतांची आवश्यकता होती. हॅरिस यांच्यापेक्षा ३.२ टक्...