पोस्ट्स

ऑगस्ट, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मध्य पूर्वेतील संघर्ष कधी थांबणार? (नवशक्ती)

इमेज
मध्य पूर्वेतील संघर्ष कधी थांबणार ? मध्य पूर्वेतील इस्त्राईल आणि हमास यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होत नाही. उलट दिवसागणिक तो अधिक उग्र होत आहे. युद्धातील बळींची संख्या हजारोंच्या घरात आहे. लहान मुले, महिला, ज्येष्ठ असे निष्पाप प्राण गमावत आहेत. तर, लाखो जायबंदी झाले आहेत. या युद्धात आता इराणही उडी घेण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे हा संघर्ष थांबण्यासाठी फक्त चमत्कारच होण्याची गरज आहे. भावेश ब्राह्मणकर गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्राईलवर हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे १२०० इस्राइली नागरिकांचा बळी गेला. दहशतवाद्यांनी गाझामध्ये सुमारे २५० नागरिकांना ओलीस ठेवले होते. इस्राईलच्या म्हणण्यानुसार, १११ नागरिक अजूनही हमासच्या कैदेत आहेत. यामध्ये ३९ मृतदेहांचाही समावेश आहे. ओलिसांमध्ये १५ महिला आणि ५ वर्षाखालील २ मुलांचा समावेश आहे. ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या इस्राईलने हमासविरोधात युद्धाची घोषणा केली आणि थेट हमासवर धडाकेबाज हल्ले सुरू केले आहेत. या युद्धात आतापर्यंत ३२९ इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आहे. इस्त्राईल आणि हमास यांच्यातील युद्धात गेल...

राजनाथ सिंहांचा अमेरिका दौरा

इमेज
राजनाथ सिंहांचा अमेरिका दौरा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे चार दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या पोलंड आणि युक्रेन भेटीपाठोपाठ हा दौराही अतिशय महत्त्वाचा आहे. संरक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक महत्वपूर्ण चर्चा आणि करार होणार आहेत. - भावेश ब्राह्मणकर २२ ऑगस्ट रोजी वॉशिंग्टन येथे चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर पोहोचल्यानंतर तेथील भारतीय समुदायाशी संवाद साधताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महत्वाचे विधान केले. ते म्हणाले की, भारत आणि अमेरिका एकत्रितपणे भक्कम   शक्ती आहे जी   जगात शांतता , समृद्धी आणि स्थैर्य सुनिश्चित करू शकते. भारत आणि अमेरिका हे एकमेकांचे नैसर्गिक सहयोगी आहेत त्यामुळे ते मजबूत भागीदार होणे साहजिक असून   हे सहकार्य सतत वृद्धिंगत होत आहे , असे त्यांनी सांगितले. यातूनच या दौऱ्याचे महत्व अधोरेखित होते. भारताला एक मजबूत , सुरक्षित आणि समृद्ध राष्ट्र म्हणून विकसित करायचे आहे. त्यानुषंगाने सिंह यांचा अमेरिका दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात भारत आणि अमेरिकेच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांनी दोन प्रमुख करारांवर स्वाक्षरी केली. पुरवठा ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया-युक्रेन युद्ध थांबवणार? (नवशक्ती)

इमेज
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया-युक्रेन युद्ध थांबवणार? तब्बल अडीच वर्षांपासून युद्धाने होरपळणाऱ्या युक्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भेट देत आहेत. सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर स्वतंत्र झालेल्या युक्रेनमध्ये भारतीय पंतप्रधान प्रथमच जात आहेत. गेल्या महिन्यात रशियाला जाऊन आलेल्या मोदींनी युक्रेनचा दौरा करण्याचा निर्णय का घेतला ? यातून काय साध्य होणार आहे ? जागतिक पातळीवर कुठला संदेश जाणार आहे ? की रशिया-युक्रेन युद्ध मोदींकडून थांबवले जाणार आहे ? भावेश ब्राह्मणकर तिसऱ्यांदा सत्तेत विराजमान झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम रशियाचा दौरा केला. त्यानंतर आता ते युक्रेनच्या भेटीवर आले आहेत. हा लेख आपण वाचत असताना मोदी युक्रेनमध्ये असणार आहेत. पोलंड आणि युक्रेन या देशांच्या अधिकृत भेटींसाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि पोलंड दरम्यान असलेल्या राजनैतिक संबंधांना ७० वर्षे पूर्ण होत असताना माझा हा पोलंड दौरा होत आहे. पोलंड हा देश मध्यवर्ती युरोपातील महत्त्वाचा आर्थिक भागीदार आहे. लोकशाही आणि बहुपक्षीयता यांच्याप्रती आपली परस्पर कटिबद्धता आपल्य...

भारतीय हिरे उद्योग आणि चीनचे कनेक्शन

इमेज
भारतीय हिरे उद्योग आणि चीनचे कनेक्शन सूरतमधील हिरे उद्योग १८ ऑगस्टपासून तब्बल १० दिवस बंद ठेवण्याची नामुष्की आली आहे. याचा तब्बल ८० हजाराहून अधिक कामगारांना थेट फटका बसला आहे. या उद्योगाचे आणि चीनचे मोठे कनेक्शन आहे. भावेश ब्राह्मणकर भारतातील हिरे उद्योग किती मोठा आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचे उतर सोपे आहे. भारतातून परदेशात जी काही निर्यात होते त्यात हिऱ्यांचा वाटा तब्बल १० टक्के आहे. तसेच, या उद्योगावर भारतातील तब्बल ४३ लाखांहून अधिक रोजगार अवलंबून आहे. तर, भारत हे हिरे कापणे आणि पॉलिश करण्यासाठी जगातील सर्वात मोठे केंद्र आहे. जागतिक स्तरावर पॉलिश केलेल्या १० पैकी तब्बल ९ हिरे भारतातील असतात. या आकड्यांवरुनच आपल्याला कळून चुकले असेल की महागडा असलेला हा व्यवसाय भारतासाठीही किती मोलाचा आणि महत्त्वाचा आहे. या व्यवसायातून कररुपाने देशाला मोठी गंगाजळी प्राप्त होते. तसेच, परकीय मूल्यही पदरात पडते. रोजगारामुळे आर्थिक चलनवलन मोठ्या प्रमाणात घडून येते. त्यामुळे सरकारला विविध माध्यमातून पैसा मिळतो. अशा प्रकारच्या या महत्वपूर्ण उद्योगावर सध्या संकटाची काळी छाया दाटून आली आहे...

७८ वर्षात नक्की काय कमावलं? काय गमावलं? (नवशक्ति)

इमेज
७८ वर्षात नक्की काय कमावलं ? काय गमावलं ? भारतीय स्वातंत्र्याला यंदा ७८ वर्षे पूर्ण झाली आहेत. एखाद्या देशाच्या वाटचालीत जवळपास ८ दशकांचा हा काळ अनेकविध बाबींनी महत्त्वाचा ठरतो. खासकरुन आपण नक्की काय कमावले ? आणि काय गमावले ? सिंहावलोकन करता आपल्याला काय दिसते ? भावेश ब्राह्मणकर १५ ऑगस्ट १९४७. ही भारत भूमीसाठी अत्यंत आनंद आणि अभिमानाची तारीख. ब्रिटीशांच्या जोखडातून ही भारत भूमी स्वतंत्र झाली. लोकशाहीच्या रुपाने नवा बिजांकूर येथे रोवला गेला. या घटनेला आज तब्बल ७८ वर्षे पूर्ण होत आहेत. अतिशय़ आश्वासक म्हणावा असा हा काळ आहे. काळ कुणासाठी थांबत नाही, असे म्हणतात. मग, तो भारतीय किंवा भारत भूमीसाठी कसा थांबेल ? जवळपास ८ दशकांच्या काळात अनेकानेक घटना, घडामोडी घडल्या. काही विक्रम झाले तर काही नोंदी बनल्या. यातील काही अप्रिय होत्या तर काही अभिमानास्पद. कुठल्याही देशाच्या वाटचालीत ७८ वर्षांचा काळ अतिशय महत्त्वाचा ठरतो. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आव्हानांचा डोंगर उभा होता. अन्नधान्याची उपलब्धता, रोजगार, महागाई, बेरोजगारी, पायाभूत सोयी-सुविधा, आर्थिक सुधारणा, शैक्षणिक, सामाजिक, स...

रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला जबर फटका (अक्षरनामा)

इमेज
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला जबर फटका रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून घमासान युद्ध सुरू आहे. त्याचे विपरीत परिणाम विविध देशांवर होत आहेत. भारतही त्यातून सुटलेला नाही. अमेरिकेचा दबाव झुगारून भारताने एक मोठे डील रशियाशी केले. मात्र, भारताला मोठ्या प्रतिक्षेचा सिग्नल मिळाला आहे. ही बाब चीनने हेरली आहे. भावेश ब्राह्मणकर पाकिस्तान आणि चीन या दोन देशांलगतच्या भारतीय सीमा अतिशय संवेदनशील, वादग्रस्त आणि आव्हानात्मक आहेत. त्यामुळे या दोन्ही सीमा कणखर आणि सुरक्षित होण्यासाठी भारताला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि क्षेपणास्त्रांची गरज आहे. काळाबरोबर जे बदलत नाहीत ते मागे पडतात. जे देश सुरक्षा व्यवस्थेत कमजोर बनतात त्यांचे भवितव्य काळोखात जाते. भारतासारख्या देशाला अशाप्रकारची बाब परवडणारी नाही. खासकरुन चीन आणि पाकिस्तानसारख्या कुटील देश शेजारी असताना. अशातच रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा फटका भारताला बसतो आहे. अमेरिकेला नाराज करुन भारताने एस-४०० ही क्षेपणास्त्र प्रणाली रशियाकडून घेण्याचे डील भारताने केले. ही बाब जगभरात चर्चेची ठरली. अनेक देशांच्या भुवया उंचावल्या. त...

बांगलादेशच्या अस्थैर्याला कोण जबाबदार? पाक, चीन की भारत? (नवशक्ति)

इमेज
बांगलादेशच्या अस्थैर्याला   कोण जबाबदार ? पाक, चीन की भारत ? हेडिंग वाचून कदाचित दचकला असाल ना ! बांगलादेशमध्ये झालेले हिंसक आंदोलन, परागंदा झालेल्या पंतप्रधान, अस्थिर सरकार, लष्करी राजवट हे सारेच अनपेक्षित नक्कीच नाही. गेल्या काही महिने आणि दिवसातील घडामोडींमुळे ते अधिकच ठळक झाले होते. पाकिस्तान व चीनच्या साथीने हे घड(व)त गेले. तर, बांगलादेश व भारताने त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. भावेश ब्राह्मणकर शेजारी राष्ट्र असलेल्या बांगलादेशमध्ये दोन दिवसांपूर्वी अभूतपूर्व अशा घडामोडी घडल्या. तरुण आणि नागरिकांच्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसिना यांच्यावर थेट मायदेशातून पलायन करण्याची नामुष्की ओढावली. लष्कराकडे सर्व सूत्रे आली आहेत. आता हंगामी सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तेथील परिस्थिती चिघळेल की शमेल हे यथावकाश स्पष्ट होईलच. मात्र, तेथील ही सद्यस्थिती का आणि कशी निर्माण झाली ? तसेच त्यास कोण कारभीणूत आहे ? याचा वेध घेणे अगत्याचे आहे. दक्षिण आशियातील भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये अस्थिर सरकार, असंतोष, हिंसक आंदोलने, हुकुमशाही आणि लष्करी वरचष्मा दिसून येतो....