पोस्ट्स

ऑगस्ट, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उत्तरेमुळे बिघडतेय चेन्नईची हवा! (सामना - उत्सव पुरवणी)

इमेज
उत्तरेमुळे बिघडतेय चेन्नईची हवा ! राजकीय वैर आणि सत्ताधाऱ्यांमधील मतभेदांमुळे दिल्ली आणि चेन्नई यांचे नाते विळ्याभोपळ्याचे आहे. त्यामुळे उत्तर-दक्षिणेतील वाद नेहमीच चर्चेत असतात. त्यातच आता तर उत्तरेमुळे चेन्नईची हवा बिघडत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भावेश ब्राह्मणकर केंद्रातील भाजप सरकार आणि तामिळनाडूतील डीएमके सरकार यांच्यातील वाद बहुचर्चित आहे. राज्यपालांची भूमिका आणि वर्तन असो की प्राथमिक शिक्षणात तिसरी भाषा म्हणून हिंदीचा समावेश किंवा जीएसटीच्या थकीत रकमेचे वितरण अशा विविध पातळ्यांवर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात मतभेद आहेत. तमिळ अस्मिता विरुद्ध उत्तरेचे राजकारण असाही पदर त्यास जोडला जातो. गेल्या अनेक दशकांपासून उत्तर विरुद्ध दक्षिण असे चित्र रंगते आहे किंवा रंगविण्यात येते. त्यातही भारतीय जनता पक्षाकडून प्रादेशिक पक्षांना अडचणीत आणण्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोपही डीएमके पक्षाकडून केला जातो. मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दाही असाच तापला. लोकसंख्यावाढीमुळे उत्तरेत खासदारांची संख्या अधिक होईल. मात्र, नियोजनामुळे दक्षिणेत लोकसंख्या स्थिर राहिल्याने तेथील खासदार तेव...

नृशंस हत्यांचा कळस अन बेदरकार नेतन्याहू (नवशक्ती)

इमेज
नृशंस हत्यांचा कळस अन बेदरकार नेतन्याहू गेल्या २३ महिन्यांपासून गाझा पट्टीत सुरू असलेला नरसंहार कल्पनेपलिकडचाच आहे. जगाच्या इतिहासात हिटलरचे क्रौर्य कुख्यात आहे. इस्राईलचे सर्वेसर्वा बेंजामिन नेतन्याहू यांनी आता त्यापुढची पायरी गाठून मानवतेलाच काळिमा फासली आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण जग निपचितपणे याचे साक्षीदार बनत आहे. भावेश ब्राह्मणकर अन्नासाठी तडफडणारी लहान मुले... औषधांसाठी कासावीस झालेले रुग्ण... सत्य परिस्थिती जगाला दाखविण्यासाठी धडपडणारे पत्रकार... कुणीतरी सहाय्य करेल या आशेने आसुसलेले ज्येष्ठ नागरिक... अन्नाची पाकिटे शोधण्यासाठी भटकणाऱ्या गर्भवती महिला... औषधोपचाराच्या चिंतेत असलेले मधुमेह, रक्तदाब आणि दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्ण... भळभळती जखम घेऊन हिंडणारे जखमी... सैरावैरा धावणारे तरुण आणि प्रौढ... या साऱ्यांवर बेछूट गोळ्या झाडल्या जात आहेत किंवा बॉम्ब टाकून त्यांची निर्दयीपणे हत्या केली जात आहे. ही काही काल्पनिक किंवा इतिहासातील घटना नाही. गाझा पट्टीमध्ये दिवसाढवळ्या आणि बिनदिक्कतपणे हा सारा नंगानाच इस्राईलकडून सुरू आहे. याचे नेतृत्व करीत आहेत नृशंस हत्यांचे शिरोमणी बेंज...

चिंताजनक ‘ड्राय स्पेल’! (सामना - उत्सव पुरवणी)

इमेज
चिंताजनक ‘ ड्राय स्पेल ’! गेली अडीच महिने कोरडेठाक असलेले अनेक जिल्हे आता तुफान वृष्टीने बेजार झाले आहेत. हे असे वारंवार घडते आहे. शास्त्रीय भाषेतील हा ‘ ड्राय स्पेल ’ अर्थ व समाजकारणावर विपरीत परिणाम करत आहे. म्हणूनच तो सर्वाधिक चिंतेचा आहे. भावेश ब्राह्मणकर राज्यभरात होत असलेल्या मुसळधार पावसाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. मात्र, या साऱ्यामध्ये एक बाब प्रकर्षाने दुर्लक्षित राहत आहे. त्यावर अधिक प्रकाश टाकणे गरजेचे आहे. जून आणि जुलै हे संपूर्ण तर अर्धा ऑगस्ट असे एकूण अडीच महिने निम्मा महाराष्ट्र पावसाच्या प्रतिक्षेत होता. लागवड केलेली आणि हातची पिके पाण्याअभावी जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण अचानक पावसाची कृपा झाली. पाहता पाहता पावसाने तुफान बॅटिंग सुरू केली. ज्या पिकांना पाऊस हवा होता त्यांना आता तो एवढा मिळाला आहे की त्यांनी थेट मानच टाकली आहे. म्हणजेच, आधी पावसाअभावी आणि आता पावसामुळे उभी पिके वाया जाण्याची वेळ आली आहे. सुक्या-ओल्या दुष्काळाचा हा फेरा अतिशय गंभीर आहे. मान्सून कुठे आणि कसा बरसेल हे कुणाच्या हातात नसले तरी त्यातील हा बदल चिंता करायला लावणाराच आहे...

चीनच्या जवळ जाणे कितपत फायद्याचे? (नवशक्ती)

इमेज
चीनच्या जवळ जाणे कितपत फायद्याचे ? डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफचा भोकाडा दाखविल्याने चीनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न भारत करीत आहे. रशिया-चीन-भारत अशी आघाडी जगभर दबदबा निर्माण करेल आणि अमेरिकेलाही शह देईल. प्रत्यक्षात हे होईल का ? भावेश ब्राह्मणकर चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी भारत दौऱ्यावर आले. परराष्ट्र मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत त्यांनी चर्चा केली. यी यांच्या आमंत्रणानुसार ऑगस्टच्या अखेरीस चीनमध्ये होणाऱ्या शांघाय शिखर परिषदेला पंतप्रधान मोदी जाणार आहेत. खासकरून अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय मालावर (२५ अधिक २५ असे एकूण) ५० टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर भारत चीनशी जवळीक करीत असल्याचे बोलले जात आहे. ही सलगी कितपत योग्य आहे ? यातून काय साध्य होणार ? भारताला त्याचा अधिक फायदा आहे की चीनला ? आजवरचा इतिहास काय सांगतो ? ट्रम्प हे तोंडाळ नेते असल्याने त्यांना प्रत्युत्तर देणे किंवा उघडपणे कुठलेही भाष्य करणे भारताने टाळले आहे. अन्य पर्यायांची चाचपणी भारताने सुरू केली आहे. ...

हिमालयालाच नजर लागली! (सामना - उत्सव पुरवणी)

इमेज
हिमालयालाच नजर लागली ! भारताची शान आणि अभेद्य सुरक्षा रक्षक म्हणून ओळख असलेल्या हिमालय पर्वतरांगांनाच जणू नजर लागली आहे. त्यामुळेच तेथे विविध आपत्ती सातत्याने धडकत आहेत. हे हवामान बदलामुळे होते आहे का ? की आपणच त्यास कारणीभूत आहोत ? भावेश ब्राह्मणकर गेल्या काही आठवड्यात तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. १. उत्तराखंडच्या धराली येथे ढगफुटी झाली. हाहाकार माजला. संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गडप झाले. शेकडो बेपत्ता आहेत. बचाव व शोधकार्य अजूनही सुरूच आहे. २. ‘… तर एक दिवस अख्खे हिमाचल प्रदेश राज्यच नष्ट होईल ’ , असा निर्वाणीचा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ३. अद्भूत निसर्ग सौंदर्याने नटलेल्या मसुरीत येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला १ ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणी सक्तीची झाली आहे. हिमालय पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये सातत्याने विविध नैसर्गिक आपत्ती येत आहेत. भूस्खलन, पूर, ढगफुटी आदींमुळे क्षणार्धात होत्याचे नव्हते होत आहे. धराली येथील ढगफुटीच्या आपत्तीने कसा हाहाकार माजला याचे व्हिडिओ सोशल मिडियात प्रचंड ...

बरं झालं मुनीर अण्वस्त्रांबद्दल बोलले! (नवशक्ती)

इमेज
बरं झालं मुनीर अण्वस्त्रांबद्दल बोलले ! पाकिस्तानी लष्कर प्रमुखांनी अमेरिकेत अण्वस्त्रांबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. यानिमित्ताने पाकची विचारधारा आणि आगामी काळातील रणनिती स्पष्ट झाली आहे. शिवाय भारताला नामी संधीही चालून आली आहे. भावेश ब्राह्मणकर जहाल वक्तव्य आणि कट्टर प्रतिमा असलेले पाक लष्कर प्रमुख असीफ मुनीर सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. महिन्याभरातच ते दुसऱ्यांदा तेथे गेले आहेत. गेल्या वेळी अमेरिकन अध्यक्षांसोबत त्यांनी जेवण घेतले. आता ते विविध ठिकाणी भेटीगाठी घेत आहेत. अमेरिकेतील पाक समुदायासोबत मुनीर यांनी संवाद साधला. त्यात त्यांनी अनेक मुक्ताफळे उधळळी आहेत. ‘ आमच्याकडे अण्वस्त्रे आहेत आणि संरक्षणासाठी त्याचा आम्ही बिनधास्त वापर करू. पाकिस्तानवर आपत्ती आली तर अर्ध्या जगाला घेऊन आम्ही बुडू ’ हे त्यापैकीच आहे. त्यांचे दुसरे वक्तव्य असे की, ‘ गुजरातच्या जामनगरमध्ये अंबानींच्या रिलायन्सचा जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. जर, भारताने पुन्हा पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तान सर्वप्रथम जामनगरच्या प्रकल्पाला लक्ष्य करेल. ’ त्यांच्या या वक्तव्यावरुन भारतात अतिशय तिखट...