पोस्ट्स

जुलै, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोंडीच्या खताला मुत्सद्देगिरीची उतारा! (नवशक्ती)

इमेज
कोंडीच्या खताला मुत्सद्देगिरीची उतारा ! भारतीय अर्थव्यवस्थेची कोंडी करण्याचा डाव हाणून पाडण्यात केंद्र सरकारला यश आले आहे. मुत्सद्देगिरीतून भारताने खेळलेले डावपेच यशस्वी झाले आहेत. इथून पुढेही असेच होणे आवश्यक आहे. भावेश ब्राह्मणकर गेल्या वर्षापासूनच भारतीय अर्थव्यवस्थेभोवती एक अदृष्य वादळ घोंघावत होते. त्याची फारशी कल्पना भारत सरकारला आली नाही. या वर्षाची सुरुवात होताच ते वादळ आणखी मोठे होऊ लागले. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात भारताने ‘ ऑपरेशन सिंदूर ’ राबविले. त्यानंतर मात्र, भारतीय अर्थव्यवस्थेला जबर हानी पोहचविण्याचा चंग झाला. मान्सूनचा वर्षाव सुरू होत असतानाच या वादळाने वेग घेतला. पण, हे वादळ थोपविण्यात अखेर भारत सरकारला यश आले आहे. शह देण्याच्या प्रयत्नांना थेट काटशह देऊन भारताने बाजी उलटवली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ही बाब आता ठळक झाली आहे. भारताचा शेजारी असलेला आणि महासत्तेकडे मार्गक्रमण करणारा चीन हा कुटील कारस्थानांसाठी ख्यात आहे. खासकरुन भारताविरोधात त्याचे डावपेच सतत सुरू असतात. आताही चीनने भारतीय कृषी क्षेत्राला लक्ष्य करण्याचे उद्दीष्ठ ठेवले खरे पण त्याला त...

हवीहवीशी दिल्ली आता नकोशी! (सामना उत्सव पुरवणी)

इमेज
हवीहवीशी दिल्ली आता नकोशी !   ‘ कधी एकदाचे दिल्लीतून परत जाईन ’, हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे वक्तव्य आणि जुन्या वाहनांच्या बंदीवरुन दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी तीन दिवसातच केलेले घुमजाव यामुळे राजधानीच्या प्रदुषणाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. ही समस्या नक्की काय आहे आणि ती सुटण्यासाठी काय करायला हवे ? याचा घेतलेला हा आढावा... भावेश ब्राह्मणकर देशाच्या राजधानीत जाण्यासाठी राजकारण्यांसह साऱ्यांचीच महत्वाकांक्षा असते. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची अनेकांची तयारी असते. दिल्लीत सत्ता, मंत्रीपद, जबाबदारी आणि अनेक बाबी मिळविण्यासाठी पराकोटीची चढाओढ, स्पर्धा नित्य सुरू असते. अशा स्थितीत दिल्लीच नकोशी होणे हे आश्चर्यजनकच म्हणावे लागेल. नुकत्याच झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमात नितीन गडकरींनी विधान केले की, “ दिल्लीत मी केवळ दोन ते तीन दिवस राहतो. जेव्हा जेव्हा मी दिल्लीत येतो तेव्हाच विचार करतो की इथून केव्हा जायचे आहे. दिल्लीतून परतण्याचे तिकीट मी सर्वप्रथम काढतो. दिल्लीतील प्रदुषणाचा प्रश्न गांभिर्याने घ्यायला हवा. सर्वसामान्यांचे जीवन कमी होत आहे ” , दिल्लीला केंद्रीय मंत्...

तब्बल १९ देशांच्या एकजुटीने चीनला धडकी (नवशक्ती)

इमेज
तब्बल १९ देशांच्या एकजुटीने चीनला धडकी महासत्तेसाठी आसुसलेल्या चीनला जबर धडकी भरली आहे. तब्बल १९ देशांचे ४० हजार सैनिक सशस्र मैदानात उतरले आहेत. भारतही यात सहभागी झाला असून जगात पहिल्यांदाच असा प्रकार घडत आहे. भावेश ब्राह्मणकर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे सध्या चीन दौऱ्यावर आहेत. चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांची भेट घेऊन त्यांनी ऑस्ट्रेलिया-चीन संबंध आणि व्यापार बळकट करण्याबाबत चर्चा केली. त्याचवेळी तिकडे दक्षिण चीन समुद्रात ऑस्ट्रेलियाच्याच पुढाकाराने तब्बल १९ देशांचे लष्करी पथक सराव करीत आहे. सुमारे ४० हजार सैनिक सशस्र सज्ज आहेत. तसे पाहता हा काही योगायोग नाही, तर मुत्सद्देगिरी आणि डावपेचांचा एक भाग आहे. याद्वारे ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी चीनला अनेक इशारे दिले आहेत. सर्वप्रथम दक्षिण चीन समुद्रात नेमके काय घडते आहे ते जाणून घेऊ. आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा युद्ध सराव होत आहे. ‘ तॅलिस्मन सेबर ’ असे त्याला नाव देण्यात आले आहे. ‘ तॅलिस्मन सेबर ’ चा अर्थ आहे जादुई तलवार. म्हणजेच ही जादुई शक्ती चीनच्या पोटात गोळाच आणणारी आहे. गेल्या काही दशकात चीनने दक्षिण समुद्र...

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)

इमेज
भारतावर हे महाकाय संकट धडकणार ? जागतिक अर्थ, राजकारण आणि संरक्षण क्षेत्रात तेल अतिशय केंद्रस्थानी आहे. दोन्ही महायुद्धात तेलाचे स्थान कळीचेच होते. आता याच तेलावरुन भारतावर महासंकट धडकण्याची चिन्हे आहेत. भावेश ब्राह्मणकर भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या व्यापार कराराची बोलणी सुरू आहे. तसे पाहता ९ जुलैपर्यंत अंतिम करार किंवा त्याची घोषणा अपेक्षित होती. तत्पूर्वी याबाबत मॅरेथॉन वाटाघाटी सुरू होत्या आणि आहेत. भारताचा मोठा गट अमेरिकेत ठाण मांडून बसला आहे. व्यापार शुल्क वाढविण्याच्या भीतीने आपल्यासोबत वाटाघाटी करण्याची वेळ अमेरिकेने अनेक देशांवर आणली आहे. अमेरिकला अधिकाधिक लाभ मिळावा हा यामागे हेतू आहे. भारतासोबतचा व्यापार करार अंतिम झालेला नसतानाच एक चिंताजनक बाब समोर येत आहे. एकप्रकारे हे भारतावरील महासंकटच म्हणता येईल. त्यामुळे त्याबाबत विस्तृत जाणून घेणे अगत्याचे आहे. संपूर्ण जगाचा डोलारा तेलामुळेच किंवा तेलावरच चालतो आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. देशोदेशीची अर्थव्यवस्था, विकास आणि इतर अनेक बाबी तेलावरच अवलंबून आहेत. भूगर्भात असलेली ही मौलिक साधनसंपत्ती या पृथ्वीतलाची अदभूत...

मज हवा किंग कोब्रा! (सामना - उत्सव पुरवणी)

इमेज
मज हवा किंग कोब्रा ! ही कुणा दुसऱ्या-तिसऱ्याची मागणी नसून खुद्द मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची आहे. त्यांना किंग कोब्रा का हवाय ? एवढेच नाही तर त्यांना राज्यात चक्क सापांची गणनाही करायची आहे. मध्य प्रदेशात नेमकं काय घडतंय ? भावेश ब्राह्मणकर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत डॉ. मोहन यादव. ते सर्वप्रथम चर्चेत आले २०२३ मध्ये. राज्याच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या. शिवराज सिंग चौहान यांच्या पश्चात राज्याचे नेतृत्व कुणाच्या हाती सोपवले जाणार याची देशभर उत्सुकता होती. नेता निवडीच्या बैठकीत मागच्या रांगेत बसलेल्या यादव यांच्या गळ्यात माळ टाकण्यात आली. त्यामुळे ते प्रकाशझोतात आले. त्यानंतर आता पुन्हा देशभर ते चर्चिले जात आहेत. निमित्त आहे ते दोन मोठ्या घोषणांचे. पहिली म्हणजे मध्य प्रदेशात किंग कोब्रा आणण्याचे आणि दुसरी, राज्यात सापांची गणना करण्याचे. या घोषणांमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी त्या का केल्या ? जनतेवर त्याचा काय परिणाम होणार आहे ? पर्यावरणाचे काय ? आदी प्रश्न उपस्थित होत आहेत. यादव यांना किंग कोब्रा का हवा आहे ? याचा उलगडा त्यांन...

सिंह गर्जना खरोखरच वाढणार? (साप्ताहिक सकाळ)

इमेज
सिंह गर्जना खरोखरच वाढणार ? गुजरातमध्ये आशियाई सिंहांची संख्या ८९१ पर्यंत वाढल्याचे समोर आले आहे. पाच वर्षांपूर्वी गुजरातमध्ये ६७४ सिंह होते. म्हणजेच , अर्ध दशकात २१७ सिंह वाढले आहेत. ही वाढीव संख्या आनंद साजरे करण्यासारखी आहे का ? प्रत्यक्षात सिंह गर्जना नक्कीच वाढेल का ? सिंहांची ही आकडेवारी चिंता करायला लावणारी बनली आहे का ? या सर्वाचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. भावेश ब्राह्मणकर गुजरात सरकारच्या नोंदीनुसार , पहिली सिंह गणना १९३६ मध्ये जुनागढच्या नवाबाने केली होती. १९६५ मध्ये गीर अभ्यारण्याची घोषणा करण्यात आली. सिंहासाठीचे हे स्वतंत्र अभयारण्य ठरले. त्यानंतर सिंह गणना सुरू करण्यात आली. आशियाई सिंहांची कमी होणारी संख्या लक्षात घेता दर ५ वर्षांनी सिंह गणना करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार ती केली जाते. यंदाची गणना ही सोळावी आहे. सिंह प्रकल्प २०२० मध्ये ७४ वा स्वातंत्र्यदिन देशात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंहांच्या दीर्घकालीन संवर्धन आणि संरक्षणावर लक्ष केंद्रित करणारा सिंह प्रकल्प (प्रोजेक्ट लायन) सुरू केला. त्यासाठी २९२७ कोटी रुपयांची ...