पोस्ट्स

जानेवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डीपसीकच्या भूकंपाचे जगभर हादरे! (नवशक्ती)

इमेज
अत्यंत कमी खर्च आणि कालावधीत डीपसीक या कृत्रिम बुद्धिमत्तेवरील तंत्रज्ञानाने जागतिक पातळीवर भूकंप घडविला आहे. त्याचा केंद्रबिंदू चीन असला तरी त्याचे जबर हादरे अमेरिकेसह अनेक देशांना बसले आहेत. हे सगळे कसे झाले ? अचानक की जाणिवपूर्वक ? भारताचे काय ? नजिकच्या काळात काय होणार ? भावेश ब्राह्मणकर डीपसीक हे चॅटबॉट ॲ प अवघ्या काही दिवसातच लाखोच्या संख्येने अमेरिकेत डाऊनलोड झाले आणि एकच गहजब उडाला. विशेष म्हणजे, अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्विकारल्याच्या दिवशीच हे घडावे हा योगायोग होता का ? डीपसीक नक्की काय आहे ? त्याचा एवढा गवगवा का होत आहे ? कृत्रिम बुद्धिमत्तेवरील आणि खासकरुन अमेरिकन दिग्गज कंपन्यांच्या पोटात गोळा का उठला आहे ? हजारो जणांचे कोट्यवधींचे नुकसान कसे झाले ? नजिकच्या काळात आणखी काय काय घडणार आहे ? हे सारे जाणून घेतले नाही तर त्याच्या गंभीर परिणामांना सामोरे जावेच लागेल. जे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी चॅटजीपीटी, गुगल, मेटा सारख्या दिग्गज कंपन्यांना काही वर्षे आणि अब्जावधीची गुंतवणूक करावी लागली त्यांना चिनी डीपसीकने जबरदस्त तडाखा दिला...

अवैध घुसखोरांचे भारताला तगडे आव्हान

इमेज
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर अवैध घुसखोरांचा प्रश्न चर्चिला जात आहे. बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान या शेजारी देशांलगतची सीमा भक्कम नाही. अस्थिरता, बेरोजगारी, महागाई आदींमुळे तेथील नागरिकांचा ओढा भारताकडे आहे. परिणामी, भारताची अंतर्गत सुरक्षाच धोक्यात आली आहे. भावेश ब्राह्मणकर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा शरीफुल इस्लाम हा बांगलादेशी असून तो मेघालयातील नदी ओलांडून भारतात बेकायदा घुसला. त्यानंतर तो थेट मुंबईत आल्याचे तपासात दिसून येत आहे. सेलिब्रेटीवर झालेल्या या हल्ल्यामुळे देशभरात ही बाब चर्चेची ठरत आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून अवैध घुसखोरांचा प्रश्न कायम आहे. त्याबाबत फारशी चर्चा होत नाही किंवा त्याकडे गांभिर्याने पाहिले जात नाही. निवडणूक काळात हा प्रश्न तेवढा चर्चिला जातो. परंतु, भारताच्या अंतर्गत सुरक्षेवर घात करणारा हा प्रश्न अतिशय गांभिर्याने घेण्याची गरज आहे. अन्यथा भारताच्या सार्वेभोमत्वालाही धोका पोहचू शकतो. जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि लोकसंख्यांपैकी एक तर दक्षिण आशियातील महत्वाचा देश असलेल्या भारताला बांगलादेश (४०९६ किमी), चीन...

प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आणि भारताची मुत्सद्देगिरी (नवशक्ती)

इमेज
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत ? भारत सरकारने कुठल्या देशाच्या प्रमुखांना निमंत्रित केले आहे ? त्यामागे काय कारण आहे ? याद्वारे कोणती मोठी ‘ डील ’ होणार आहे ? मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून भारत चीनला कसा शह देऊ पाहत आहे ? भावेश ब्राह्मणकर भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा हा मोठी संधी आणि परराष्ट्र संबंधांबरोबरच मुत्सद्देगिरीला वाव देणारी एक महत्वपूर्ण बाब असते. आजवर भारत सरकारने या संधीचे वेळोवेळी सोने केले आहे. आताही तसाच एक प्रकार घडत आहे. यंदाच्या सोहळ्यासाठी भारत सरकारने इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींना निमंत्रित केले आहे. हिंद महासागरालगतच्या या देशाची भारताने निवड का केली ? त्यातून काय साध्य केले जाणार आहे ? हे जाणून घेणे आवश्यक आहे. दरवर्षी २६ जानेवारी रोजी राजधानी नवी दिल्लीत साजरा होणारा प्रजासत्ताक दिनाचा समारंभ अतिशय देखणा, दिमाखदार आणि प्रतिष्ठीत असा असतो. या सोहळ्याला एखाद्या देशाच्या प्रमुखाला विशेष निमंत्रित करण्याचा प्रघात आपल्याकडे आहे. यानिमित्ताने देशोदेशी आपले संबंध दृढ करण्याचे प्रयत्न केले जातात. बहुमान आणि सरबराई द्वारे त्या देशाला भारताचे...

प्रयागराज कुंभमेळ्यात 'माँ गंगा' कुठे आहे?

इमेज
या आठवड्यात प्रयागराजमध्ये सुरू होणाऱ्या कुंभमेळ्याचा प्रचंड गाजावाजा सुरू आहे. उत्तर प्रदेशसह केंद्र सरकारकडून या वैश्विक सोहळ्याचे ब्रँडिंग केले जात आहे. योगी सरकारने तर गाणे, जाहिराती या साऱ्यांवर भर दिला आहे. मात्र, ज्या नदीमध्ये हा कुंभमेळा भरतो आहे त्या माँ गंगेचे काय ? गंगेच्या प्रदूषण आणि सद्यस्थितीविषयी कुणीच, काहीच का बोलत नाही ? खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतही गंगा मैलीच का आहे ? भावेश ब्राह्मणकर देशभरातील सर्व माध्यमांमध्ये प्रयागराज कुंभमेळा आणि त्यांच्या जाहिराती दिसून येत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, दीड लाख तंबू, सुरक्षेचा फौजफाटा, शेकडो कॅमेऱ्यांची नजर आदींवर भर दिला जात आहे. योगी सरकार तर कोट्यवधी रुपये खर्चून कुंभमेळ्याचे ब्रँडिंग करीत आहे. सहाजिकच या महासोहळ्याची सर्वत्र चर्चा होत आहे. मात्र, पवित्र अशा गंगा नदीमध्ये हा कुंभमेळा भरतो. याच नदीत स्नान केल्याने पापक्षालन होत असल्याची धारणा आहे. त्याच गंगा नदीचे पावित्र्य आपण हिरावून घेतले आहे. आजवर कोट्यवधी रुपये खर्च झाले पण गंगेला तिचे पुनर्वैभव प्राप्त झालेले नाही. त्याविषयी ना...