पोस्ट्स

डिसेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

इमेज
तिबेटमध्ये जगातील सर्वात मोठे धरण ब्रह्मपुत्र नदीवर चीन उभारणार असल्याचे वृत्त जसे धडकले तसे अनेकांचे फोन आणि मेसेज सुरू झाले. भारताचा यावर काय परिणाम होणार ? चीन खरोखरच हे महाकाय धरण बांधणार आहे का ? ब्रह्मपुत्र नदी कोरडी होणार का ? भारताच्या जलविद्युत प्रकल्पाचे काय ? या सर्वांचा घेतलेला हा धांडोळा... भावेश ब्राह्मणकर अखेर चीनने आपल्या भात्यातील ब्रह्मास्त्र बाहेर काढले आहे. ते म्हणजे जगातील सर्वात मोठे धरण बांधण्याचा. त्सांगपो किंवा यारलुंग झांबो (यार्लुंग त्सांग्पो) अर्थात ब्रह्मपुत्र नदीवर हे धरण असणार आहे. आपल्याच अधिपत्याखाली असलेल्या तिबेटच्या भूभागावर हे धरण तब्बल १३७ अब्ज डॉलर खर्चून बांधले जाणार आहे. या धरणामुळे पर्यावरण किंवा कुठल्याही क्षेत्रावर विपरीत परिणाम होणार नाहीत, असा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी केला आहे. तसेच, भारत किंवा बांगलादेश यांना मिळणारे पाणीही कमी होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्यक्षात हा चिनी कावा नक्की काय आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. तिबेटच्या या महाकाय धरणाची बिजे रोवली आहेत ती १९ व्या शतकातील ५०...

मोहम्मद युनूस यांचा बोलवता धनी कोण? (नवशक्ती)

इमेज
बांगलादेशचे हंगामी अध्यक्ष मोहम्मद युनूस यांचा ऑगस्टपासून सुरू असलेला कारभार चिंताजनक आहे. पाकिस्तान व चीनशी जवळीक, हसिनांच्या प्रत्यार्पणाची मागणी, अल्पसंख्याकांवरील हल्ले, वादग्रस्त धोरणात्मक निर्णय आदींचा त्यात समावेश आहे. भारतासाठी ही बाब अडचणीची असून युनूस यांच्यामागे कुणाचा वरदहस्त आहे ? हे शोधायलाच हवे. भावेश ब्राह्मणकर ग्रामीण विकास बँकेचे संस्थापक, बांगलादेशवासियांचे जीवनमान उंचावण्यासाठी ठोस प्रयत्न आणि नोबेल पुरस्कार विजेते अशी मोहम्मद युनूस यांची ओळख. पण, सध्या ते बांगलादेशचे हंगामी अध्यक्ष आहेत. देशातील अस्थैर्य योग्य पद्धतीने हाताळणे आणि पारदर्शक सार्वत्रिक निवडणूक लवकरात लवकर घेणे ही युनूस यांची मुख्य जबाबदारी. मात्र, गेल्या पाच महिन्यातील त्यांचा कारभार वेगळेच काही दर्शवतो आहे. निवडणुकीविषयी चकार शब्दही न काढता असंख्य धोरणात्मक आणि दूरगामी निर्णय घेण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. यातून बांगलादेशचे हित नक्की कसे साधले जाणार ? या यक्षप्रश्नासह भारतासोबतचे संबंध अतिशय कठीण होणार आहेत. हे काही सहजासहजी घडत नाही. तो योगायोगही नाही. त्यामागे नक्की कोण आहे ? गेल्या जुल...

श्रीलंकन अध्यक्षांचा भारत दौरा किती सफल, संपूर्ण? (नवशक्ती)

इमेज
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसनायके यांनी पहिल्याच विदेश दौऱ्यासाठी भारताची निवड केली. त्यानुसार ते दिल्लीत आले. या दौऱ्यात काय घडलं ? भारताच्या दृष्टीने या दौऱ्याला किती महत्त्व आहे ? यापुढील काळात दोन्ही देशांचे संबंध कसे असतील ? कुणाला अधिक फायदा होईल ? भावेश ब्राह्मणकर दक्षिण आशियातील छोटा घटक आणि भारताचा सागरी शेजारी असलेल्या श्रीलंकेत नुकतेच नवे सरकार सत्तारुढ झाले. डाव्या विचारसरणीचे अनुरा कुमार दिसनायके (एकेडी) यांच्या नेतृत्वात श्रीलंकेची वाटचाल सुरू झाली आहे. देशवासियांच्या जिव्हाळ्याचे विषय आणि समस्यांना हात घालणाऱ्या आणि त्या सोडविण्याची आशा असलेल्या एकेडी यांच्यावर खुप मोठी जबाबदारी आहे. अनेक आव्हाने असली तरी त्यांनी विचारपूर्वक निर्णय घेण्यास प्रारंभ केला आहे. डावी आणि मार्क्सवादी विचारांच्या चीनला अधिक जवळ करण्याऐवजी एकेडी यांनी पहिल्या विदेश दौऱ्यासाठी भारताला प्राधान्य दिले. यातूनच त्यांची आगामी वाटचाल ही अतिशय चाणाक्षपणे राहिल, असे संकेत मिळाले आहेत. चीनने श्रीलंकेतील बंदर विकसित केले आहे. शिवाय महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणारा आणि एकाच विचारांचा अस...

सागरमाला आणि वाढवण : विकासाची सुदर्शनचक्रे (साप्ताहिक सकाळ)

इमेज
जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालेला भारत आता पहिल्या तीन मध्ये येण्याची स्वप्ने पहात आहे. गेल्या दीड दशकात विकास चक्रे गतिमान झाली आहेत. आणि आता सागरमाला ही योजना आणि वाढवण हे बंदर विकसित करण्याचे उद्दीष्ट समोर आहे. हे दोन्ही प्रकल्प म्हणजे विकासाचे सुदर्शनचक्रच म्हणायला हवे. कारण , सुदर्शन चक्र हे कुठल्याही बाजूला भरभिरतानाच अचूक लक्ष्य वेधते. अगदी तशाच पद्धतीने हे दोन्ही प्रकल्प प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या असंख्य क्षेत्र तसेच व्यवसायांवर परिणाम करणार आहेत. यातून रोजगार निर्मिती , गुंतवणूक आणि अर्थव्यवस्थेला चालना अपेक्षित आहे. भावेश ब्राह्मणकर सागरमाला प्रकल्प सागरमाला हा केंद्रातील मोदी सरकारचा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. भारताला तिन्ही बाजूने सागरी किनारा लाभला आहे. पश्चिमेला अरबी समुद्र , दक्षिणेला हिंद महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर. जलमार्गाने होणारी मालवाहतूक ही अधिक सुरक्षित , किफायतशीर आणि स्वच्छ आहे. सध्या भारतातील किमतीच्या दृष्टीने ९५ टक्के व संख्यामानानुसार ७० टक्के मालवाहतूक सागरी मार्गाने होते. तरीही आधुनिक तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा यांच्या ...