पोस्ट्स

सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नाशिकमधील 'मेरी' नक्की काय काम करते?

इमेज
महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट : सरकारी बांधकामांचा मेंदू नाशिकमध्ये कार्यरत असलेली महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी) ही केवळ धरणेच नाही तर राज्यभरातील बांधकामांचा मेंदू आहे. अतिशय शिस्तबद्ध असे मेरीचे कार्य आहे. संशोधन, अभ्यास आणि प्रशिक्षण या त्रिसूत्रीवर मेरीने आपले वेगळेपण प्रस्थापित केले आहे. ही संस्था नेमकी काय आहे आणि कशी कार्य करते याचा घेतलेला हा धांडोळा... भावेश ब्राह्मणकर राज्यभरात जी काही धरणे बांधली जातात त्याचे संपूर्ण श्रेय हे महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी) संस्थेला जाते. केवळ एवढी एकच ओळख या संस्थेची राज्यभरात आहे. पण, मेरी केवळ तेवढेच कार्य करते का? तर नाही. मेरीच्या कार्याची ओळख करुन घेताना राज्याच्या विकासातील तिचे योगदान तर कळून चुकतेच शिवाय मेरीविषयी आपल्याला मोठा आदर वाटायला लागतो. एखादी प्रशासकीय संस्था मैलाचा दगड ठरावे, असे कार्य किती व कसे करु शकते, याचा प्रत्यय मेरी देत आहे. राज्यभरात रस्ते, धरण आणि इतरही बांधकामे सरकारला करावी लागतात. त्यामुळे या कामांसाठी अभ्यास आणि संशोधन करणारी मातृसंस्था असावी असा विचार पन्ना...

लंकेत नवा भिडू, नवे राज्य (नवशक्ती)

इमेज
लंकेत नवा भिडू, नवे राज्य भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या श्रीलंकेमध्ये सार्वत्रिक निवडणुकीनंतर अनुरा कुमार दिसनायके हे राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. डाव्या विचारसरणीचे असलेल्या दिसनायके यांच्यापुढे अनेक आव्हाने आहेत. चीनकडे ते अधिक झुकतील की भारताकडे ? कर्जाच्या खाईतून लंकेला बाहेर काढण्याचे शिवधनुष्य त्यांना पेलवेल का ?   भावेश ब्राह्मणकर भारतापासून हाकेच्या अंतरावर, हिंद महासागरातील छोटे बेट, दक्षिण आशियातील राष्ट्र अशी श्रीलंकेची ओळख. प्राचीन ग्रंथ रामायणामुळे लंकेची महती भारतीयांना चांगलीच परिचीत आहे. मौल्यवान जैविक विविधता, दाट जंगल, चहुबाजूने महासागर, समुद्र किनारे, नैसर्गिक संसाधने यामुळे संपन्न असलेली श्रीलंका मात्र गेल्या काही वर्षांपासून आर्थिक गर्तेत आहे. आणि अशाच परिस्थितीत श्रीलंकेमध्ये सार्वत्रिक निवडणूक शांततेत संपन्न झाली. निकाल लागला आणि अनेकांना धक्का बसला. कारण, ज्यांचे नाव चर्चेत नव्हते, घराणेशाहीचा जे घटक नाहीत, राजकारणाचा ज्यांना वारसा नाही असे अनुरा कुमार दिसनायके विजयी झाले. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०२२ मध्ये नागरिकांच्या असंतो...

पाकिस्तानसोबतचा सिंधू करार भारताने रद्द करावा का?

इमेज
  पाकिस्तानसोबतचा सिंधू करार भारताने रद्द करावा का ? भारताने पाकिस्तानला नोटीस बजावल्याने सिंधू जल वाटप करार पुन्हा चर्चेत आला आहे. सहा दशकांपूर्वी झालेला हा करार काय आहे ? भारताने नोटीस का बजावली ? पाकिस्तानची भूमिका काय आहे ? भारताने हा करार संपुष्टात आणून पाकिस्तानचे पाणी बंद करावे का ? आता पुढे काय होणार ? भावेश ब्राह्मणकर भारत आणि पाकिस्तान हे सख्खे शेजारी असले तरी तेवढेच कट्टर शत्रू आहेत. फाळणीनंतर दोन्ही देशांमध्ये शत्रूत्वाचा विस्तव पेटला तो आजतागायत धगधगतो आहे. जम्मू-काश्मीरमध्ये उगम पावणाऱ्या नद्यांच्या पाण्यावरुनही फाळणीनंतर लगेचच तंटे निर्माण झाले. हा वाद जागतिक पातळीवर चर्चेचा ठरला. अखेर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधू जल वाटप करार झाला. १९ सप्टेंबर १९६० रोजी भारताचे तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि पाकिस्तानचे तत्कालिन राष्ट्रपती अय्यूब खान यांनी या करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार , पूर्व वाहिनी नद्या असलेल्या रावी , बियास आणि सतलज या तीन नद्या आणि त्यांच्या पाण्यावर भारताचा हक्क असेल. तर , पश्चिम वाहिनी नद्या असलेल्या सिंधू , चिनाब आणि झेलम य...

काश्मीरचा फैसला करणारी निवडणूक (नवशक्ती)

इमेज
काश्मीरचा फैसला करणारी निवडणूक जगात जे काही मोजके वादग्रस्त प्रदेश आहेत, त्यात काश्मीरचा समावेश होतो. आणि आता तेथेच सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने त्याकडे संपूर्ण जगाचेच लक्ष लागून आहे. ही निवडणूक आणि तिचा निकाल अनेक अर्थाने अत्यंत महत्त्वाचा आहे... भावेश ब्राह्मणकर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फाळणीनंतर सर्वाधिक चर्चा आणि वादाचा मुद्दा बनला तो काश्मीरचा. हिमालय पर्वत रांगेतील या प्रदेशाच्या हक्कावरुन सुरू असलेला संघर्ष अजूनही सुरूच आहे. तो कधी शमेल हे सांगणे अवघड आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भाग पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो. भारताकडील प्रदेशाची दोन राज्ये झाली आहेत. त्यात जम्मू-काश्मीर आणि लडाख यांचा समावेश आहे. सध्या जम्मू-काश्मीर या राज्यात सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्याचे २५ सप्टेंबर तर तिसऱ्या टप्प्याचे मतदान १ ऑक्टोबरला होणार आहे. निकाल ८ ऑक्टोबर रोजी लागणार आहे. जम्मू-काश्मीरच्या ७ जिल्ह्यांमध्ये विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. त्यातील ९ जागा अनुसुचित जमातींसाठी तर ७ जागा अनुसुचित जातींसाठी आहेत. काश्मीर खोऱ्या...

असा सुटेल बिबट्यांचा प्रश्न

इमेज
असा सुटेल बिबट्यांचा प्रश्न शहरे आणि गावांमध्ये तसेच मानवी वस्तीकडे बिबट्या येण्याचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. दबा धरुन असलेल्या या बिबट्याने भीतीचे वातवरण तयार होते. बिबट्यांच्या या प्रश्नाकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. भावेश ब्राह्मणकर मार्जार कुळातला प्राणी असलेला बिबट्या हा वन्यप्राणी आहे. मात्र , गेल्या काही वर्षात त्याचा अधिवास धोक्यात आल्याने तो सातत्याने मानवी वस्तीकडे येण्याचे प्रकार घडत आहेत. यातूनच मग , मानव आणि वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत आहे. परिणामी , लहान बालकांना उचलून नेणे , बिबट्याच्या हल्ल्यात काही जण जखमी होणे , शेतपिकांची नासाडी होणे , बिबट्याचा वावर असल्याने त्या परिसरात शेतीची कामे खोळंबणे अशा कितीतरी बाबी घडत आहेत. यातूनच बिबट्यांविषयी कणव न वाटता थेट बिबट्यांचा संहार करण्याची मानसिकताही बळावत आहे. बिबट्या हा नकोसा होणे हे तसे आशादायी चित्र नक्कीच नाही. कारण , निसर्ग साखळीतील एक महत्त्वाचा घटक म्हणूनही बिबट्याचे अस्तित्व मोलाचे आहे. पण , विविध कारणांमुळे बिबट्यांचे घर असुरक्षित बनले आहे आणि यातूनच ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर प्रभावी तोडगा...