पोस्ट्स

एप्रिल, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

“डुबई” चा धडा! (दै. सकाळ)

इमेज
  चकाचक बिल्डींग आणि भौतिक साधनांचे साम्राज्य असलेली दुबई चक्क पाण्यात असल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियात तुफान व्हायरल झाले आहेत. जगातील सर्वात बिझी विमानतळही ठप्प झाले आहे. हे सारे का आणि कसे घडले ? भावेश ब्राह्मणकर पर्यावरण आणि संरक्षणशास्त्र विषयाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार धो धो पाऊस... पाण्यात तुंबलेले रस्ते... ठप्प झालेली वाहतूक... कसला तरी आडोसा शोधणारे नागरिक... पाण्याच्या डबक्यात उभे असलेले विमान... या आणि अशा कितीतरी फोटो, व्हिडिओनी सध्या सोशल मिडिया जणू ओसांडून वाहतो आहे. चर्चा आहे ती दुबईच्या “ डुबई ” ची. ढगफुटीसदृश पावसाने दुबईची पार वाताहत झाली आहे. जुलै २००५ मध्ये भारताची आर्थिक राजधानी मुंबई सुद्धा अशीच जलमय बनली होती. त्यावेळीही त्याची जबरदस्त चर्चा झाली. वाळवंटी प्रदेश असलेल्या दुबईत अशा प्रकारे आणि एवढा पाऊस का झाला, दुबईची डोळे दिपावणारी भौतिक प्रगती एवढी कशी तकलादू ठरली, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. आखाती प्रदेशाचा एक भाग असलेल्या दुबईमध्ये सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवस अशरशः कठीण परीक्षा बघणारेच ठरले. दुबईत सोमवारी रात्री पावसाला सुरुवात झा...

चीनचा कावा वेळीच ओळखा (दै. लोकसत्ता)

इमेज
  अरुणाचल प्रदेशावर सातत्याने दावा सांगणाऱ्या चीनचा कावा नेमका काय आहे हे वेळीच ओळखण्याची गरज आहे. हिंद महासागर असो की भारताची शेजारी राष्ट्रे अशा सर्वच आघाड्यांवर चीनचे कुरघोडी आणि वर्चस्वाचे डाव सुरू आहेत. याबाबत गाफील राहणे म्हणजे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेण्यासारखे आहे. भावेश ब्राह्मणकर संरक्षण व पर्यावरण विषयाचे अभ्यासक व मुक्त पत्रकार १. अरुणाचल प्रदेशातील सेला बोगद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदघाटन केले. भारतीय सैन्यासाठी हा बोगदा अतिशय महत्त्वाचा आहे. चीनने भारतीय पंतप्रधानांच्या दौऱ्यावर आक्षेप घेतला. २. अरुणाचल प्रदेश हा आमचाच भूभाग आहे आणि तो दक्षिण तिबेटचाच एक भाग असल्याची गुरगुर पुन्हा एकदा चीनने केली. ३. अरुणाचल प्रदेशातील ३० गावांची नावे बदलून ती चीनने जाहीर केली. एकामागोमाग घटलेल्या या घटना नेमक्या काय सांगतात. सामरिकशास्त्रामध्ये त्यास विशेष महत्व आहे. भारताचा शेजारी देश असलेल्या चीनने भारतीय भूभागावर अशा प्रकारे दावा सांगणे हे काही पहिल्यांदाच झालेले नाही. मात्र, एकापाठोपाठ एक अशा घडामोडी घडणे हे म्हणावे तसे साधे नक्कीच नाही. चीनच्या मनात ने...

...तर जर्मनीत सोडला जाणार २० हजार हत्तींचा कळप (अक्षरनामा)

इमेज
 जगभरात सध्या एका धमकीची विशेष चर्चा आहे. ती म्हणजे, जर्मनीमध्ये तब्बल २० हजार हत्तींचा कळप सोडून देण्याची. खास म्हणजे ही धमकी काही दहशतवादी संघटनेने किंवा एखाद्या व्यक्तीने दिलेली नाही. तर चक्क एका देशाच्या अध्यक्षांनी दिली आहे. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. ही धमकी का देण्यात आली. कुठल्या देशाने दिली याविषयी जाणून घेणारा हा विशेष लेख.... भारतामध्ये जसा बिबट्या आणि हत्ती यांच्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष आहे. अगदी तशाच प्रमाणे जगातील अनेक देशांमध्ये हा प्रश्न निर्माण झाला आहे. वृक्षतोड, विकासासाठी जंगलांमध्ये मानवी हस्तक्षेप आणि विविध प्रकारचे कारणे त्यास आहेत. बोत्सवाना हा अफ्रिका खंडातील एक देश. या देशात सध्या हत्तींचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, या देशात हत्तींची संख्या आहे तब्बल १ लाख ३० हजाराहून अधिक. एकट्या देशातच एवढे हत्ती झाल्याने अनेकानेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मुळात हा देश गरीब आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान केले जात असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्...

आधी संरक्षण, नंतर राजकारण! (दै. सकाळ)

इमेज
भारतीय वायूसेनेचे माजी प्रमुख भदौरिया यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकारणात प्रवेश केला आहे. संरक्षण क्षेत्रातील व्यक्ती राजकीय क्षेत्रात येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. आजवर अनेकांनी संरक्षण क्षेत्राद्वारे देशसेवा केल्यानंतर राजकीय प्रवेशातून राजकारण आणि समाजकारण केले आहे. त्या सर्वांचा घेतलेला हा धांडोळा... - भावेश ब्राह्मणकर मेजर जनरल जेकब फर्ज राफेल जेकब यांनी महूच्या ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूलमधून पदवी प्राप्त केली.   दुसऱ्या महायुद्धात त्यांना उत्तर इराकमध्ये तैनात करण्यात आले. १९४३ मध्ये त्यांची तोफखाना ब्रिगेडमध्ये बदली झाली. ब्रिटिश सैन्याने त्यांना ट्युनिशिया मोहिमेवर पाठवले. १९४३ पासून युद्ध समाप्तीपर्यंत जेकब यांच्या युनिटने बर्मा मोहिमेत जपानी साम्राज्याविरुद्ध लढा दिला. नंतर त्यांना सुमात्रा येथे नियुक्त करण्यात आले. भारत-पाक फाळणीनंतर ते भारतीय सैन्यात दाखल झाले. १९६३ मध्ये त्यांना ब्रिगेडियर म्हणून बढती मिळाली. १९६५च्या भारत-पाक युद्धात त्यांनी इन्फंट्री डिव्हिजनचे नेतृत्व केले. पुढे हीच राजस्थानातील बारावी इन्फंट्री डिव्हिजन बनली. वाळवंटातील युद्धावर भारतीय...