पोस्ट्स

जानेवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ऑफ बिट करिअर -- कृषी अभियांत्रिकी

इमेज
ऑफ बिट करिअर -- कृषी अभियांत्रिकी ‘मला इंजिनिअर व्हायचं’ असं म्हणणाऱ्यांची आज कमी नाही. सिव्हिल, मेकॅनिकल, कम्प्युटर, आयटी यासारख्या काही शाखांकडेच विद्यार्थ्यांचा कल असतो. पण, अभियांत्रिकी क्षेत्रात आजघडीला असंख्य शाखा आहेत. त्यातील काहींची तर केवळ तोंडओळखच असल्याने त्याकडे फार कुणाचा कल नसतो. कृषी अभियांत्रिकी (अ‍ॅग्री इंजिनिअरींग) ही शाखा त्यापैकीच एकत म्हणावी लागेल. या शाखेत शिक्षणाच्या आणि त्यानंतर नोकरीच्या अमाप संधी आहेत. येत्या काळाचा विचार करुन या शाखेत प्रवेश घेणं आणि त्यात करिअर करणं हा अत्यंत सूज्ञपणाच ठरणार आहे. भावेश ब्राह्मणकर शहरात राहणाऱ्या मंडळींचा कृषी क्षेत्राशी फारसा परिचय राहत नाही. पण, वाढत्या लोकसंख्येमुळे वाढणाऱ्या अन्नधान्याचा विचार करता कृषी क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे. आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या काळात कृषी क्षेत्रातही झपाट्याने बदल होत आहेत. नांगरणी, कुळवणी, तण काढणे, पाणी देणे, पीक कापणे, धान्य मळणे व साठवणी या शेतीच्या कामांसाठी कमीत कमी माणसांचा उपयोग करून यंत्रांच्या साहाय्याने शेतीचे उत्पन्न वाढविण्यास मदत करणाऱ्या शाखेला कृषी अभियांत...

अॅग्री बायोटेक क्षेत्रात करिअरच्या खुप संधी

इमेज
ऑफ बीट करिअर - अॅग्री बायोटेक जगाची लोकसंख्या आता सात अब्ज इतकी आहे. आगामी २० वर्षात ही संख्या दहा अब्ज असणार आहे. या लोकसंख्येला आवश्यक ते अन्नधान्य पुरविण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठीच कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संधीचा आपण गांभिर्याने विचार करायला हवा. अॅग्री बायोटेक हे सुद्धा त्यातीलच एक करिअर आहे.  भावेश ब्राह्मणकर कमी पाण्यात वाढणारे पीक, हवामानातील बदलांचा परिणाम होणारी कृषी वाणे, कमी खर्च आणि जास्त उत्पादन या आणि अशा विविध प्रकारच्या संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी जगभरातच विलक्षण प्रयत्न सुरु आहेत. परिणामी, येत्या काळात कमी जागेत सर्वाधिक उत्पादन घेण्याचा आणि वाढत्या मागणीत योग्य तो अन्नधान्याचा पुरवठा करण्याचे कसब साध्य होऊ शकणार आहे. हे सारे ज्या शास्त्रावर आधारीत आहे ते म्हणजे अॅग्री बायोटेक अर्थात कृषी जैवतंत्रज्ञान. खासकरुन कृषी विद्यापीठांमध्ये या क्षेत्रात मोठे काम सुरु आहे. नव्या पिढीने या क्षेत्राचा करिअरसाठी गांभिर्याने विचर करण्याची गरज आहे कारण या क्षेत्रातल्या संधी आगामी काळातील केवळ भारताच्याच नाही तर विश्वातीलच अन्नधान्याचा प्रश्न सोडविणार आहेत. भारताती ...