पोस्ट्स

मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खासदार शिष्टमंडळाच्या शिष्टाईचे यशापयश (नवशक्ती)

इमेज
खासदार शिष्टमंडळाच्या शिष्टाईचे यशापयश पहलगाम हल्ल्यानंतर भारताची भक्कम बाजू आणि पाकिस्तानचे पितळ उघडे पडण्यासाठी भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ सध्या देशोदेशीचे दौरे करीत आहे. या शिष्टमंडळाच्या शिष्टाईला कितपत यश आले आहे ? पाकिस्तानवर त्याचा काय आणि किती परिणाम होत आहे ? याचा विचार करणे आवश्यक आहे. भावेश ब्राह्मणकर काश्मीरमध्ये पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या नागरिकांवर अमानुषपणे दहशतवाद्यांनी केलेला हल्ला भारताच्या खूपच जिव्हारी लागला. या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा हात असल्याचे दिसून आले. याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील एकूण नऊ दहशतवादी स्थळांना नष्ट करण्यात आले. मात्र , तडकाफडकी शस्त्रसंधी करण्यात आली. जी आजही कायम आहे. या शस्त्रसंधी संदर्भात अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. असो. एवढे मोठे ऑपरेशन राबवूनही पाकिस्तानला कुठलाही फटका बसत नाही किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांकडून पाकिस्तानला एकटे पाडले जात नाही किंवा त्यांच्यावर कारवाई स्वरूप कुठलाही निर्णय होताना दिसत नसल्याने भारताने अखेर वेगळे अस्त्र...

पहलगाम हल्ल्याच्या मासपूर्ती नंतर (नवशक्ती)

इमेज
पहलगाम हल्ल्याच्या मासपूर्ती नंतर काश्मीरमधील क्रूर दहशतवादी हल्ल्याला एक महिना पूर्ण झाला आहे. पुलवामाप्रमाणे हे हल्लेखोरही मोकाटच राहणार का ? या कालावधीत भारताने काय कमावले आणि काय गमावले ? याउलट पाकिस्तानची स्थिती काय ? भावेश ब्राह्मणकर १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे भारतीय सैन्याचा ट्रक स्फोटांनी उडविण्यात आला. ४० सैनिक हुतात्मा झाले. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे पर्यटकांना निर्दयीपणे गोळ्या घालण्यात आल्या. कुटुंबियांसमोरच तब्बल २६ पर्यटक गतप्राण झाले. हे दोन्ही दहशतवादी हल्ले अतिशय़ भीषण. मात्र, या दोन्ही हल्ल्यांचे आरोपी अद्यापही सापडलेले नाहीत. आपल्या सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांचे हे सपशेल अपयश आहे. भलेही या हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर लक्ष्य केले असेल. पण, या हल्ल्यांचा बदला पूर्ण झालेला नाही. पहलगामच्या हल्ल्याला एक महिना पूर्ण होत असताना भारताच्या हाती काय लागले ? दहशतवाद्यांना पोसणाऱ्या व बळ देणाऱ्या पाकिस्तानच्या पदरात काय पडले ? याचा विचार करणे आवश्यक आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने ‘ नरो वा कुंजरो वा ’ अशी भूमिका घेतली. केव्हाही...

पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी का आणि कशी झाली? (नवशक्ती)

इमेज
पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी का आणि कशी झाली ? ऐन भरात असलेले ‘ ऑपरेशन सिंदूर ’ अचानक का स्थगित झाले ? शस्त्रसंधी कशी काय झाली ? अब्जावधींचा निधी देणाऱ्या अमेरिकेचा शत्रू लादेनला आश्रय देणारा पाक भारतासाठी विश्वासार्ह कसा झाला ? वारंवार आपल्या पाठीत खंजीर खुपसणारा आणि दहशतवाद पोसणाऱ्या पाकच्या एका फोनवर आपण शस्त्रसंधी केली ? अमेरिका श्रेय का घेते आहे ? भारत सरकारला मिठाची गुळणी टाकावीच लागेल... भावेश ब्राह्मणकर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे एकाचवेळी दहशतवाद्यांच्या एकूण ९ ठिकाणांवर जबर हल्ले केले. केवळ पाकव्याप्त काश्मीरच (पीओके) नाही तर थेट पाकिस्तानात आणि ते सुद्धा पंजाब प्रांतातील दहशतवादी स्थळे अचूकपणे उद्वस्त केली. पाक एवढा हादरला की त्याने सीमेबरोबरच भारतीय शहरे आणि सैन्य ठिकाणांवर ड्रोन, क्षेपणास्त्र आणि मानवविरहीत वाहन (युएव्ही) यांच्याद्वारे हल्ला चढविला. भारतीय सैन्याची जय्यत तयारी, शस्त्रांची उपलब्धता आणि कार्यक्षमता यामुळे हे हल्ले निकामी ठरले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तसेच तुर्की व चीनच्या संरक्षण सामग्रीद्वारे पा...

बदलते तंत्र, नवे रणांगण! (नवशक्ती)

इमेज
बदलते तंत्र , नवे रणांगण! भारत-पाकिस्तान यांच्यात वाढलेला तणाव आणि याचदरम्यान होणारा विविध अस्त्र-शस्त्रास्त्रांचा वापर सध्या विशेष चर्चेचा बनला आहे. काळाच्या ओघात जसे रणांगण बदलले आहे तसे तंत्रही. म्हणूनच ते समजून घेणे अगत्याचे आहे. भावेश ब्राह्मणकर बलाढ्य मुघलशाही , आदिलशाही आणि कुतुबशाहीला तोंड देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावासारखे शस्त्र परजले. त्याचा एवढा प्रभावी वापर केला की , हजारो आणि लाखोच्या संख्येने असलेल्या फौजा केवळ शेकडोने असलेल्या मावळ्यांनी हादरवून सोडल्या. पारंपरिक शस्त्रांना फाटा देत वाघनखे , दगड , गोफण , अग्नी अशा कल्पक अस्त्रांचा चपखल उपयोग महाराजांनी केला. परिणामी , तिनशे ते चारशे वर्षांच्या साम्राज्याला शिवाजी राजांनी अवघ्या काही दशकातच सुरूंग लावला. म्हणजेच पारंपरिक युद्धाला तोंड देण्यासाठी महाराजांनी नवा आयाम दिला. त्यानंतर भारतात प्रवेश केलेल्या ब्रिटीश , पोर्तुगीज , डच , फ्रेंच आदींनी त्यांच्याकडील बंदुकांसह तोफांचा वापर करुन पुढील पिढीच्या शस्त्रास्त्रांची ओळख सर्वांना करुन दिली. तेव्हापासून आता २१व्या शतकातील तिसऱ्या दशकात युद्ध तंत्रात ...

‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी; पुढे काय? (नवशक्ती)

इमेज
‘ ऑपरेशन सिंदूर ’ यशस्वी ; पुढे काय ? ‘ लष्कर ए तोयबा ’ , ‘ जैश ए मोहम्मद ’ आणि ‘ हिज्बुल मुजाहिदीन ’ या दहशतवादी संघटनांच्या पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील तळांना अचूकपणे उद्धवस्त करुन भारतीय सैन्य दलांनी ‘ ऑपरेशन सिंदूर ’ यशस्वी केले आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यातील आणखी एक टप्पा पूर्ण झाला आहे. आता प्रश्न आहे तो, इथून पुढे काय ? भावेश ब्राह्मणकर काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांची निघृण हत्या करुन दहशतवाद्यांनी भारताला जणू खुले आव्हान दिले. पुरुष पर्यटकांना त्यांच्या पत्नीच्या देखत आणि ते सुद्धा अत्यंत जवळून गोळी घालत दहशतवाद्यांनी क्रूरतेचे दर्शन घडविले. जगभर या हल्ल्याचा तीव्र निषेध झाला. याचनिमित्ताने पाकिस्तानसारख्या अत्यंत असंवेदनशील आणि दहशतवाद्यांना पाठिशी घालणाऱ्या देशाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. अमेरिकेसारख्या महासत्ता असणाऱ्या देशावर ९/११चा हल्ला झाला. ओसामा बिन लादेन या दहशतवाद्याच्या नेतृत्वाखाली झालेला हा हल्ला अमेरिकेला चांगलाच जिव्हारी लागला. हाच ओसामा चक्क पाकिस्तानमध्ये होता. अमेरिकेने गेली अनेक दशके पाकला गोंजारले. आणि याच पाक...